Shiv Sena deputy leader Sanjay Nirupam targets Sanjay Raut : भांडूपचा भोंगा बोलतोय पाकिस्तानची भाषा
Mumbai : २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर उबाठाकडून भाजपसोबत युती करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची भेट घेण्यासाठी उबाठाचे नेते प्रयत्न करत असल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम यांनी केला. पण भाजपने उबाठासाठी सर्व दरवाजे बंद केले आहेत, असेही निरुपम म्हणाले.
संजय निरुपम यांनी काल (५ एप्रिल) मुंबईत पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, उबाठाचे खासदार भाजपसोबत जाण्याच्या तयारीत होते. पण आपण सर्वच भाजपसोबत जाऊ, असा विश्वास उबाठाने खासदारांना दिला. त्यामुळे तुर्तास खासदारांनी उबाठा सोडण्याचे टाळले. २०१९ मध्ये धोका दिल्यानंतर आता भाजप उबाठाला कुठल्याही परिस्थितीत सोबत घ्यायला तयार नाही. तरीही त्यांची तडफड सुरू आहे.
Our government : सेवा शुल्क वाढले, ‘आपले सरकार’चा वापर कमी होणार !
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकार आणि लष्कर सज्ज झाले आहे. पाकिस्तानला या हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी लागेल. केंद्र सरकारने पाकिस्तानला घेरण्याची रणनिती आखली आहे. आयातबंदी लागू केली, पाणी बंद केले. समुद्री व्यापार बंद केला. तिन्ही दलांकडून युद्धाचा अभ्यास सुरू झाला आहे. सिंधू जल करार पूर्वीच स्थगित केला आहे. आता चिनाब आणि झेलम नदीवरील धरणे बंद करून पाकिस्तानची पुरती कोंडी केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू झाले आहे, असे निरुपम यांनी सांगितले.
काँग्रेस आणि भांडूपचा भोंगा पाकिस्तानची भाषा बोलू लागला आहे, असे म्हणत निरुपम यांनी उबाठाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर कडवी टीका केली. महाराष्ट्र आणि देशविरोधी बोलणाऱ्या राऊतांचा सर्वांनी निषेध करावा, असे आवाहन त्यांनी केले. राज्यातील महिलांसाठी सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आहे. पण ही योजना बंद झाली, अशी खोटी माहितीली भोंग्याने दिली.
Farmer ID : शेतकऱ्यांसाठी ‘फार्मर आयडी’ची नोंदणी अत्यावश्यक !
राऊत यांना खोटे बोलण्याची, अपप्रचार करण्याची सवय झाली आहे. प्रत्यक्षात लाडकी बहीण योजना सुरू आहे. त्यांना दरमहा पैसे देण्यास सरकार कटीबद्ध आहे. लाडकी बहीण योजना कुणीही बंद करू शकत नाही. आता १५०० रुपये दिले जात आहेत. भविष्यात सरकार महिलांना २१०० रुपये नक्की देईल. तसा शब्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे आणि ते दिलेला शब्द पूर्ण करतील, असा विश्वास संजय निरुपम यांनी व्यक्त केला.