Breaking

Uddhav Thackeray: चिंधीचोर मिंधे स्वतःला मोदींचा घरगडी म्हणतो…

Uddhav Thackeray criticism eknath shinde pm narendra modi bjp : उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदे, भाजपला सणसणीत टोला

Mumbai: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतंच मुंबईतील शिवसेना भवनात एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत त्यांनी भाजपसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. शिंदे गटाला ‘चिंधीचोर मिंधे’ असे म्हणत मिंधे स्वतःला मोदींचा घरगडी म्हणतो थोडं काय झालं की गावाला जाऊन बसतो असे म्हणत जोरदार टीका केली आहे.

आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोलताना ठाकरेंनी शिंदे गटावर तीव्र शब्दांत टीका केली. यावेळी त्यांनी भाजपला मुंबई आणि मराठी माणसाची ताकद दाखवावी लागेल, असे आवाहन केले. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधताना त्यांना ‘चिंधीचोर मिंधे’ असे संबोधले. “चिंधीचोर मिंधे भाजपसोबत गेला, मी ठरवलं असतं तर भाजपसोबत गेलो असतो, पण मला भाजप विरोधात लढायचं आहे,” असे ठाकरे म्हणाले. शिंदे यांच्या दरे येथील भेटीवरूनही त्यांनी टोला लगावला. “मिंधे स्वतःला मोदींचा घरगडी म्हणतो… घरगड्याची शेती बघा शेतीत हेलिकॉप्टर, संपत्ती मालकापेक्षा जास्त थोडं काय झालं की गावाला जाऊन बसतो,असे म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर टीका केली.

Shirdi Crime News : 7 अल्पवयीनांचा प्रताप, पार्टीच्या पैशासाठी एकाला खून करून लुटले !

जगातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपचा मुंबई महानगरपालिकेत जीव अडकला आहे. हाच भाजप आणि मिंधे मुंबई अदानीच्या घशात घालू पाहत आहे, पण आपण मुंबई अदानीच्या घशात घालू द्यायची नाही. त्यासाठी लढाई लढायची आहे,असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले. ही लढाई मुंबईसाठी असून ती जिंकायचीच असे ते म्हणाले. मराठी माणसाची ताकद दाखवून देण्याची वेळ आली आहे. आता आपण काँग्रेससोबत आहोत. ठीक आहे. पण एकेकाळी नेहरूंना वाकवणारा हा महाराष्ट्र आहे, याची आठवण त्यांनी करून दिली.

Iran Israel War: विमान प्रवास, पेट्रोलच्या किंमती सह महागाई वाढणार, कामगारांवरही मोठे संकट

यावेळी उद्धव ठाकरेंनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील आपल्या आजोबांच्या योगदानाचा संदर्भही दिला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मुंबईसाठी माझ्या आजोबांनी आंदोलन केलं, त्यांचा मी नातू आहे. मी मुंबईसाठी लढाई लढणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. सध्याच्या राजकीय समीकरणावर बोलताना, त्यांनी मोरारजी देसाई यांना देखील आपण वाकवलं होतं, अशी आठवणही करून दिली. आपली लढाई मुंबईसाठी आहे ती लढाई जिंकायची आहे. त्यासाठी येत्या निवडणुकीत आपल्याला मुंबई आणि मराठी माणसाची ताकद दाखवावी लागेल, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीसाठी मराठी मतदारांना एकजुटीचे आवाहन केले.