Breaking

Water crisis : रिकामे हंडे घेऊन महिलांची ग्रामपंचायतीत धडक!

Women stormed the Gram Panchayat with empty pots : नळयोजना ठप्प, गावातील महिलांचा संताप उसळला

Buldhana सिंदखेड राजा तालुक्यातील वर्दडी बु. गावातील महिलांनी पाण्याच्या समस्येचा संताप व्यक्त करत आज थेट ग्रामपंचायत कार्यालयावर रिकाम्या हंड्यांसह मोर्चा काढला. गेल्या अनेक दिवसांपासून नळयोजना वारंवार बंद पडत असल्याने नागरिकांचा संयम सुटला आहे. महावितरणच्या गलथान कारभारामुळे नळयोजना कोलमडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

गावातील पाणीपुरवठा धरणाच्या खालील बाजूस असलेल्या शासकीय विहिरीतून केला जातो. विहिरीत पाण्याचा मुबलक साठा असतानाही वीजपुरवठा वारंवार खंडित झाल्यामुळे पाणीपुरवठा ठप्प होतो. सहा गावांचा वीजपुरवठा एकाच व्हीसीबीद्वारे जोडलेला असल्याने एका गावात बिघाड झाला, तरी संपूर्ण यंत्रणा कोसळते, ही मुख्य अडचण असल्याचे सांगण्यात येत आहे.

Supriya Sule : परिस्थिती बेताची असताना, कर्ज घेऊन प्रोजेक्ट कशाला करता?

महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयात धडक देत “आश्वासन नको, पाणी द्या!” असा रोष व्यक्त केला. घरगुती कामकाज, मुलाबाळांची काळजी आणि दैनंदिन गरजांसाठी पाणी मिळत नसल्यामुळे दिवसेंदिवस ताण वाढत असल्याचे महिलांचे म्हणणे आहे.

CM Relief Fund : शाहिस्ताला डोळ्याचा कर्करोग, वेळेवर मदत मिळाली अन् प्राण वाचले

सरपंच मधुकर इनकर यांनी सांगितले की, महावितरणकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. ग्रामस्थांनी विद्युत तारांचे नुतनीकरण, स्वतंत्र व्हीसीबीची उभारणी आणि नळयोजनांसाठी सततचा वीजपुरवठा यासाठी आग्रह धरला आहे.
गावात मूलभूत सुविधा मिळण्यात अडथळे येत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करून ही समस्या कायमस्वरूपी सोडवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.