Indira Gandhi lost, but fought the elections without stealing votes : बाळासाहेब ठाकरे आणि विनोबा भावेंचेही होते समर्थन, देवरसांनी दोन पत्रे कशासाठी लिहीली?
Mumbai : सन १९९५ मध्ये इंदिरा गांधी यांनी संविधानातील कलमानुसार आणीबाणी लावली होती. या काळात देशाला शिस्त लागली होती. त्यानंतर त्यांनी आणीबाणी उठवली आणि मतांची चोरी न करता निवडणूक घेतली. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मात्र पुढे सत्याचा विजय झाला आणि १९८० मध्ये देशातील जनतेने त्यांना पुन्हा बहुमताने विजयी केले, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.
फ्रेंड्स ॲाफ डेमोक्रसी आयोजित फॅसिस्ट हुकुमशाही विरोधी कार्यक्रमात सपकाळ बोलत होते. ते म्हणाले, आणीबाणीच्या काळात काही चुका झाल्या. पण सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी ते मान्यही केले. आणीबाणी हा वेगळा अध्याय आहे. १९७१च्या युद्धात लष्कराला तेल देणार नाही, अशी भूमिका तेल कंपन्यांनी घेतली होती. त्यामुळे नंतर या तेल कंपन्या व काही बॅंकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. आणीबाणीच्या काळात काळा बाजार, भ्रष्टाचार करण्याची कुणाची हिंमत होत नव्हती. आज मात्र याउलट परिस्थिती आहे.
Dharmapal Meshram : फासे पारधी समाजावर होणारे अमानवीय अत्याचार आटोक्यात येणार !
आज भ्रष्टाचार शिष्टाचार झाला आहे. भाजपच्या हुकुमशाहीत तीन हजार कोटींचे जास्तीचे टेंडर खास उद्योगपतींना दिले होते, ते सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. धारावी अदानीला विकली, विमानतळ दिले, मराठीवर अतिक्रमण करण्याचे काम याच हुकुमशाहीत होत आहे. याच हुकुमशाहीने महाराष्ट्राची संस्कृती आणि सभ्यतेवर घाला घातला आहे. असेही ते म्हणाले.
आणीबाणीचे समर्थन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि विनोबा भावे यांनीही केले होते. त्याच वेळी तत्कालिन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी इंदिरा गांधी यांनी दोन पत्रे लिहीली होती. ती पत्र का लिहिली होती, हे तपासले पाहिजे. आणीबाणीत काही प्रशासकीय चुका झाल्या पण काही इष्टही झाले, असे सपकाळ यांनी सांगितले.
Dada bhuse : तिसऱ्या भारतीय भाषेसाठी सक्ती न करता पर्याय दिला !
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुखपत्र शिदोरी मासिकाच्या आणीबाणीवरील विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत, माजी खासदार कुमार केतकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, श्र्वेता भट आदी उपस्थित होते.