BJP group leader Pravin Darekar’s blunt criticism : भाजपा गटनेते प्रविण दरेकरांची बोचरी टीका
Mumbai : महाराष्ट्राच्या अस्मितेचा ठेका संजय राऊत किंवा उद्धव ठाकरेंनी घेतलेला नाही. आम्हीही महाराष्ट्राच्या अस्मितेचे पाईक असणारी लोकं आहोत. केवळ उबाठा नाही तर सगळ्या पक्षांत महाराष्ट्राची अस्मिता आहे. भावनिक राजकारण करून लोकांना भुलवण्याचे दिवस संपले, हे दुर्दैवाने संजय राऊत यांना समजून येत नाही, अशी बोचरी टीका भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केली.
पत्रकारांशी बोलताना आमदार दरेकर यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले. तशा प्रकारे भुलवता आले असते तर विधानसभेला तुम्हाला जनाधार मिळाला असता, असेही ते म्हणाले. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मुंबईत काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चाबाबत बोलताना दरेकर म्हणाले ती, या प्रकरणी समाजाच्या भावना तीव्र आहेत. परंतु याबाबत राज्य सरकारने कठोर कारवाईची भुमिका घेतली आहे.
Sunil Tatkare : रोहा रेल्वे स्थानकावर दहा जलद व अतिजलद गाड्यांना मिळाला थांबा
एसआयटी नेमून आरोपीना अटक केली आहे. याप्रकरणी कुणाचीही गय केली जाणार नाही, असे राज्याच्चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात सांगितले आहे. सरकार, गृहखाते म्हणून जे करायला हवे ते केलेले आहे. गुन्हेगारीच्या विषयाला कुणीही पाठीशी घालू शकत नाही. मुख्यमंत्री आताच दावोसहून आलेत. याबाबत आढावा घेऊन आणखी सक्त आदेश देण्याची आवश्यकता असेल तर ते देतील.
जरांगे यांनी आजपासून सुरू केलेल्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात सरकारने स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. एससीबीसीचे आरक्षण दिलेले आहे. आता सरसकट प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्या, अशा प्रकारची मागणी होती, ती कायद्याच्या चौकटीत बसत नाही. मराठा समाजाच्या हितासाठी जेजे करायचे आहे ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच केले. सुदैवाने आजही ते पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मराठा समाजाच्या हितासाठी, उत्कर्षासाठी आणखी जे काही करता येईल तीच त्यांची सकारात्मक भुमिका आहे.
Amit Shah : मुंबई बँकेच्या स्वयंपुनर्विकास योजनेबाबत अमित शाह सकारात्मक !
आरक्षणा संदर्भात दिलेले आरक्षण टिकविण्यासाठी सरकार शंभर टक्के कटीबद्ध आहे. संजय राऊत यांच्या विधानावर आमदार दरेकर म्हणाले की, संजय राऊत यांनी नसते उपदव्याप कमी करावेत. त्यांच्या पत्रकार परिषदेत मुंबई, महाराष्ट्राच्या हिताच्या, विकासाच्या गोष्टी कधीच ऐकल्या नाहीत. खळबळजनक बोलायचे, विखारी टीका करायची, टोमणे मारायचे यापलीकडे संजय राऊत यांनी आतापर्यंत विकासाच्या संदर्भात काय केले, याबाबत पत्रकार परिषद घेऊन सांगावे. केवळ त्यांच्या वलग्ना आहेत. त्यांची दखल घेणे योग्य वाटत नाही.
मविआत तिन्ही पक्षाची तोंड तीन दिशेला
संविधान हे सर्वांचे आहे. संविधानाचा सर्वाधिक सन्मान भाजपा आणि एनडीएने केलाय. संविधान दिन साजरा करण्याचे काम आमच्याच सरकारने केलेय. ठाकरेंना संविधानाची आठवण येत असेल, तर आनंद आहे. तसेच महाविकास आघाडीत तिन्ही पक्षाची तोंड तीन दिशेला आहेत, असा टोलाही दरेकरांनी लगावला.
भाजपा शब्दाला जागणारा पक्ष
भाजपा हा वचनाला, शब्दाला जागणारा पक्ष आहे. महायुतीने वचननाम्यात शेतकऱ्यांसाठी जी-जी आश्वासने दिली आहेत, ती पूर्ण करण्याची जबाबदारी आणि कर्तव्य आमचे आहे. भाजपा शेतकऱ्यांच्या वचनाशी कटीबद्ध आहे, असेही आमदार दरेकर यांनी सांगितले.
CM Devendra Fadnavis : प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष’
आव्हाड न्यायाधीशांच्या भूमिकेत ?
जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विधानावर दरेकर म्हणाले की, आव्हाड यांचे अत्यंत बाष्कळ आणि मूर्खपणाचे वक्तव्य आहे. ज्या प्रकरणावरून संपूर्ण महाराष्ट्र हलला, मोठे आंदोलन झाले आणि त्या ठिकाणी ती गोष्टच झाली नाही, अशा प्रकारचा निर्वाळा देणे म्हणजे न्यायाधीशाच्या भूमिकेत आव्हाड पोचलेत की काय असेच म्हणावे लागेल.