Breaking

Nana Patole : फक्त एक मंत्री नव्हे, अख्खे सरकारच भ्रष्ट!

 

Not just one minister, the whole government is corrupt : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची घणाघाती टीका

Mumbai महाराष्ट्रात २०१४ ते २०१९ दरम्यानचे फडणवीस सरकार असो किंवा त्यानंतरचे शिंदे-फडणवीस आणि आत्ताचे महायुती सरकार असो. यांच्या काळात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे. मलई खाण्याची स्पर्धाच तिन्हीं पक्षात सुरु आहे. फक्त एक मंत्री नव्हे तर संपूर्ण भाजपा महायुती सरकारच भ्रष्ट आहे, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

भाजपा युती सरकारचे मंत्रीमंडळ भ्रष्टाचारी, खुनी आहे. कुण्या एका मंत्र्यावर बोलण्यापेक्षा सगळ्यांवरच बोलले पाहिजे अशी स्थिती आहे. धनंजय मुंडे यांच्यावर जे गंभीर आरोप होत आहेत ते निश्चितच चिंताजनक आहेत. पण हे सर्व भाजपच घडवून आणत आहे. भाजपाचाच आमदार खुलेआम पणे मुंडेंच्या भ्रष्टाचाराची पोलखोल दररोज करत आहे. पण मुख्यमंत्री काहीच कारवाई करत नाहीत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Mahayuti Government : पेपरलेस प्रक्रिया ठरणार रुग्णांसाठी वरदान!

भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्यातील अंतर्गत वादाचा हा परिणाम आहे का?, असा सवालही त्यांनी केला. काँग्रेस पक्षाला त्यांच्या अंतर्गत भांडणात पडायचे नाही. राज्यात जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. शेतकऱ्याचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. सोयाबीन, धान, कांदा उत्पादक शेतकरी हताश झाला आहे. सरकारने बांगलादेशी महिलांना लाडक्या बहिणींचे पैसे दिले आहेत, असे आरोपही त्यांनी केले.

राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. शिर्डीत कालच दोन हत्या करण्यात आल्या, महिला सुरक्षित नाहीत. परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी या आंबेडकरी विचाराच्या तरुणाची हत्या पोलीसांनी केली. बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा फेक एन्काऊंटर करण्यात आला, ही सर्व गंभीर प्रकरणे सरकार लपवत आहे पण विरोधी पक्ष म्हणून या मुदद्यांवर गप्प बसणार नाही, सरकारला या सर्वांची उत्तरे द्यावी लागतील, अशी स्पष्ट भूमिका नाना पटोले यांनी घेतली आहे.

148 encroachments in Shivangaon removed : विमानतळ नूतणीकरणाचे टेक-ऑफ!

आयोगाने लोकशाहीचा खून केला
विधानसभा निवडणुकीतील मतदानाबद्दल अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जे मुद्दे उपस्थित केले तेच मुद्दे काँग्रेस व मविआने आधीच उपस्थित केले आहेत. या प्रश्नी काँग्रेस पक्षाने निवणूक आयोगाकडे तक्रारही केलेली आहे. निवडणूक आयोगाने लोकशाहीचा खून केला आहे. प्रकाश आंबेडकर याच प्रश्नी कोर्टात गेले असतील पण राहुल गांधी यांनीही लोकसभेत काल हीच भूमिका मांडली. आता हे प्रकरण न्यायालयाकडे गेलेले आहे, यातून न्याय मिळेल अशी अपेक्षा करू असेही पटोले म्हणाले.