Breaking

Ravikant Tupkar : शेतकऱ्यांसाठी सरकारविरोधात रस्त्यावर उतरणार

Street protest against the government for farmers : रविकांत तुपकरांची कर्जमाफीसाठी जिल्ह्यात यात्रा

Buldhana शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आता सरकारविरोधात रस्त्यावरची लढाई करण्याचा निर्धार शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी व्यक्त केला. त्यासाठी ते संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात यात्रा काढणार आहे. यासंदर्भात त्यांनी सभा घेऊन घोषणा केली. यामध्ये विशेषतः हक्काचा पिकविमा, सोयाबीन- कापूस भाव फरक, नाफेडमध्ये अडकलेली शेतकऱ्यांची रक्कम, रखडलेले अनुदान, शेतीला कंपाउंड आदी मागण्यांचा समावेश आहे.

या मागण्यांसाठी जिल्हाभर मोठी यात्रा काढणार असल्याची घोषणा तुपकर यांनी केली. सरकारवर दबाव वाढवून शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरण्यासाठी आता रस्त्यावरची लढाई लढणार असल्याचे तुपकरांनी सांगितले. क्रांतिकारी शेतकरी संघटनेची बैठक बुलढाणा येथील चिखली रोडवर पार पडली. यामध्ये शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीनंतर ही पहिलीच बैठक होती, हे विशेष. यावेळी अनेकांनी क्रांतिकारी शेतकरी संघटनेमध्ये प्रवेश केला.

Neelam Gorhe : निलम गोऱ्हेंच्या विरोधात महिलांचे आंदोलन!

तुपकर यांनी सांगितले की, माझा पिंड मुळात चळवळीचा आहे. त्यामुळे आपण कधीच निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही. गेल्या 22 वर्षांपासून शेतकरी चळवळीला वाहून घेतले आहे. शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी त्यांना आधार देण्यासाठी आपण काम करत आहे. यापुढेही तेच काम करत राहू. शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन त्यासाठीच आता जिल्हाभर यात्रा करणार आहे व नंतर मुंबईकडे कुच करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

क्रांतिकारी शेतकरी संघटनेची पुणे येथे ३ मार्च रोजी राज्यस्तरीय बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यस्तरीय नियुक्या करण्यात येणार आहेत. या नियुक्त्यांच्या माध्यमातून संघटन वाढीवर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. रखडलेला पीकविमा, निवडणुकीपूर्वी दिलेले कर्जमुक्तीचे आश्वासन यावर चर्चा होईल. तसेच सोयाबीन व कापूस खरेदी सीसीआय व नाफेडने पूर्ण केली नाही. तसेच भाव फरक म्हणून ३ हजार रूपये देण्यात यावे, या मागणीवरही बैठकीत चर्चा होणार असल्याचे तुपकरांनी सांगितले.

Chandraahekhar Bawankule: राज्यातील सर्वच जात पडताळणी समित्यांना मिळाले अध्यक्ष!

अफुच्या पिकाला परवानगी द्या
शेतकरी संतोष सानप यांच्यावर अफूचे पीक घेतले म्हणून कारवाई करण्यात आली. कारवाई करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी अफू पीक का घेतले, याचा विचार शासनाने करणे आवश्यक आहे. या पीकापासून खसखसचे उत्पादन करण्यात येते. खसखस अन्नात तसेच औषधामध्ये वापरले जाते. मध्यप्रदेश, राजस्थानप्रमाणे शेतकऱ्यांना अफू, खसखस पीक घेण्यासाठी शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणीही तुपकर यांनी केली.