90.68 percent households in Nagpur division have piped water connections : प्रशासनाचा दावा; 58 हजार 246 घरांची नळ जोडणी प्रगतीपथावर
Nagpur राज्याच्या ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक नळ जोडणीद्वारे गुणवत्तापूर्ण केंद्र पुरस्कृत जलजीव मिशन राबविण्यात येत आहे. जलजीवन मिशन अंतर्गत ‘हर घर नल से जल’ योजनेत नागपूर विभागाने उत्तम कामगिरी केली आहे. 90.68 टक्के कुटुंबांना नळ जोडणीचे काम पूर्ण केले आहे, असा दावा प्रशासनाने केला आहे.
सहा जिल्ह्यांमध्ये एकूण 18 लाख 17 हजार 590 कुटुंबांपैकी फेब्रुवारी 2025 अखेर 16 लाख 48 हजार 104 कुटुंबांना नळ जोडणी देण्यात आली असून 58 हजार 246 कुटुंबांसाठीचे नळ जोडणीचे काम प्रगती पथावर आहे. जलजीवन मिशन अंतर्गत राज्याच्या ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला पिण्याच्या पाण्याची सुरक्षा देण्यात येत आहे. त्यासाठी प्रत्येक घरात नळ जोडणीद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. यानुसार गाव, जिल्हा व राज्य कृती आराखडा तयार करण्यात येतो.
Babasaheb Patil : चार महिने लोटले, ना समित्या नेमल्या, ना पदं दिली!
यानुसार नियोजित घरगुती नळ जोडण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीचे त्रैमासिक व वार्षिक नियोजन करण्यात येते. यासाठी गाव कृती आरखडा तयार करण्याकरिता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग किंवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची मदत घेण्यात येते. नागपूर विभागातही या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासकीय यंत्रणा प्रभावीपणे कार्य करीत आहे, असं सांगण्यात आलं आहे. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी Divisional Commissioner of Nagpur या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी वेळोवेळी बैठक घेवून माहिती घेतात व सूचना करतात.
जलजीवन मिशन अंतर्गत विविध प्रकारच्या योजनांचा समावेश करण्यात येतो. अशा योजनांची सुधारात्मक पुनर्जोडणी करून कार्यत्मक घरगुती नळ जोडणी देण्यात येते. गावपातळीवर पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेनुसार पुनर्जोडणी योजनांचा समावेश करण्यात येतो. या लक्षाच्या दिशेने वर्धा जिल्ह्याने विभागात आघाडी घेत 98.25 टक्के नळ जोडणी पूर्ण केली आहे. वर्धा जिल्ह्याची कामगिरी सरस असून 2 लाख 38 हजार 942 कुटुंबांपैकी 2 लाख 34 हजार 754 कुटुंबांना नळ जोडणी देण्यात आली आहे.