Breaking

Maharashtra Water Department : थकबाकीमुळे पाणीपुरवठ्यावर संकट!

 

Abhay scheme for interest waiver on water bills yet not approved : ग्राहकांना व्याजासह भरणा अनिवार्य, अभय योजनेला सरकारने मंजुरी नाही

Amravati महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने (मजीप्रा) ग्राहकांसाठी प्रस्तावित केलेल्या थकीत पाणीपट्टीवरील व्याजमाफी अभय योजनेला शासनाने अद्याप मंजुरी दिली नाही. त्यामुळे आता ग्राहकांना व्याजासह थकबाकी भरावी लागणार आहे.

शहरात एक लाखांहून अधिक ग्राहक मजीप्राच्या पाणीपुरवठ्याचा लाभ घेतात. त्यांच्याकडे एकूण ४०० कोटी रुपयांपेक्षा अधिक थकबाकी आहे. महापालिका आणि सरकारी कार्यालयांवरच १८५ कोटींची थकबाकी आहे. उर्वरित थकबाकी घरगुती व व्यावसायिक ग्राहकांकडे आहे.

प्रशासनाच्या माहितीनुसार, शहरातील पाणीपुरवठ्यासाठी दरमहा ३ कोटी आणि प्रतिवर्ष ३६ कोटी रुपये खर्च येतो. मात्र, प्रतिमाह फक्त २ ते २.५ कोटी रुपयांचीच वसुली होते. या आर्थिक वर्षात फक्त ३० कोटी रुपयेच वसूल झाले आहेत, त्यामुळे योजना तोट्यात आहे.

Ravikant Tupkar on Prataprao Jadhav : जाधव यांना मंत्रिमंडळातून काढा, नाहीतर पंतप्रधानांच्या घरापुढे आंदोलन!

ग्राहकांना व्याजमाफी मिळावी आणि त्यांनी किमान मुद्दल रकमेचा भरणा करावा, यासाठी प्रशासनाने चार ते पाच महिन्यांपूर्वी शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावाला जानेवारीपूर्वी मंजुरी मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, ९ मार्च उजाडला तरीही शासनाचा कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. परिणामी, ग्राहकांना आता व्याजासह थकीत रक्कम भरावी लागेल.

Parinay Fuke : बहिणी खुश होणार, बेरोजगारी दूर होणार!

 

ऑक्टोबर २०२३ पर्यंत थकीत देयकावर व्याजमाफी देणारी अभय योजना लागू होती. मात्र, बहुतांश ग्राहकांनी या योजनेला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे प्रशासनाने थकबाकीदार ग्राहकांना दोन टक्के दराने व्याज आकारण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, ग्राहकांकडून वेळेवर देयक न मिळाल्यास पाणीपुरवठा योजनांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ग्राहकांनी तुरंत थकीत रक्कम भरावी, अन्यथा पाणीपुरवठ्यावर संकट निर्माण होऊ शकते.