The number of missing girls is increasing : ठाकरे गटाच्या नेत्यांचा पोलिसांना सवाल, पिंपरी गवळीतील घटनेनंतर तीव्र प्रतिक्रिया
Buldhana मोताळा तालुक्यातील पिंपरी गवळी गावातून गेल्या वर्षभरात पाच ते सहा मुली बेपत्ता झाल्या आहेत. अलीकडेच एका १६ वर्षीय मुलीचे अपहरण झाले आहे. तक्रार देऊनही महिनाभरात कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. यामुळे गावकऱ्यांत संतापाची लाट उसळली आहे. बेपत्ती मुलींचा शोध पोलीस घेणार आहे की नाही, असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी उपस्थित केला.
दि. १७ मार्च २०२५ ला जालिंदर बुधवत तसेच शिवसेना नेत्या जयश्री शेळके व कार्यकर्त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच तातडीने कारवाईसाठी निवेदन दिले. बुलढाणा जिल्ह्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पिंपरी गवळी गावातील घटनेत आरोपीचे नाव स्पष्ट असतानाही पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. यामुळे पीडित कुटुंब आणि गावकरी संतप्त झाले आहेत. त्यांनीही आज पोलीस अधिक्षक SP Office कार्यालयावर मोर्चा काढला.
MLA Siddharth Kharat on farmer suicide : युवा शेतकऱ्याच्या आत्महत्येचे पडसाद विधानसभेत!
‘एका गावातून सातत्याने मुली बेपत्ता होतात. मात्र पोलिसांनी वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले आहे. हा प्रश्न संपूर्ण जिल्ह्याचा आणि राज्याचा आहे. सरकारने बेपत्ता मुलींची अधिकृत आकडेवारी जाहीर करावी’, अशी मागणी बुधवत यांनी केली. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते असताना, ते या प्रकरणाकडे दुर्लक्ष का करत आहेत? असा थेट सवालही त्यांनी केला.
याप्रसंगी गावकऱ्यांनी आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनावर कठोर कारवाईसाठी दबाव आणला. मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न राज्य सरकारने गांभीर्याने घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
लखन गाडेकर, युवासेना शहर प्रमुख अनिकेत गवळी, यादवराव मोहाडे, श्रीकृष्ण सुरडकर, सुनील इंगळे, नितीन खराटे, माजी सरपंच गजानन पवार, तसेच गावातील महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.