Breaking

Vidarbha Farmers : पिक विम्याच्या मोबदल्यावर शेतकरी नाराज!

Crop insurance payout is unsatisfactory : ५ लाख ३० हजार दावे, १७२ कोटी रुपयांचे क्लेम

Yavatmal खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत ३ लाख ४८ हजार १८० शेतकऱ्यांनी खरिपाच्या वेगळ्या पीकांचे ७लाख ९८ हजार ४५४ विमा सुरक्षा घेतले. नैसर्गीक आपत्तीमुळे विस्तृत स्थानिक आपत्ती व लघू आपत्ती अंतर्गत नुकसान भरपाईसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची संख्या ५ लाख २९ हजार ७७९ आहे. या दाव्यांना पात्र ठरवून त्यांच्यासाठी कंपनीकडून १७२ कोटी रुपयांचा मोबदला मंजूर केला. मात्र बहुतांश नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एक ते दोन हजार रूपयांच्या आत मोबदला देण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

जिल्ह्यात ११० महसूल मंडळे असून, त्यातील १०५ महसूल मंडळांमध्ये नैसर्गिक आपत्ती कोसळल. पिकांचे नुकसान झाले आहे. खरिप हंगामामध्ये नैसर्गीक आपत्तीत ७२ तास अतिवृष्टी झालेल्या घटनांमध्ये सप्टेबर २० २४ मध्ये ९३ हजार ३३६ अर्ज विमा कंपनीकडे करण्यात आले. ऑक्टोबर २०२४ मध्ये १ लाख १२ हजार ३, नोव्हेंबर २०२४ मध्ये १ लाख ६१ हजार १९९, नोव्हेंबर २०२४ मध्ये ८४ हजार ९६१, डिसेंबर २०२४ मध्ये ५९ हजार ६३३ व २ हजार ३७२ तर फेब्रुवारी २०२५ मध्ये ८६ असे एकूण ५ लाख ३८ हजार ५८८ पिक विमा योजना अर्ज करण्यात आले.

Mahayuti Government : ७५ टक्के लाभार्थी अनुदापासून वंचित, कसे होणार बालसंगोपन?

त्यातील ५ लाख १३ हजार ५९० अर्ज हे २५ टक्के सर्व्हेच्या आधारावर सामुहिक नुकसानासाठी पात्र ठरविण्यात आले. उडीद पीकासाठी २ हजार ५१० पात्र अर्जाला १२ लाख रूपये, कापुस पीकासाठी १ लाख ९९ हजार ५०७ अर्जाला ६६ कोटी ४४ लाख रूपये, तूर, हरबरा पीकासाठी १ लाख ३० हजार ६३२ अर्जाला ९ कोटी ४१ लाख, सोयाबिन पीकासाठी १ लाख ९१ हजार ६९२ अर्जाकरिता ६५ कोटी १८ लाख रूपयाची नुकसान भरपाई पीक विमा कंपनी कडून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वळती करण्यात आली आहे.