Akash Fundkar : सातकलमी कृती कार्यक्रमाची काटेकोर अंमलबजावणी करा!

Instructions from Guardian Minister Adv. Akash Fundkar : पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांचे निर्देश

Akola : शासनाच्या १०० दिवस कृती कार्यक्रमात कार्यालयांनी केलेल्या अंमलबजावणीचे परीक्षण ‘क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया’कडून होणार आहे. या कार्यक्रमाचे महत्त्व व गांभीर्य लक्षात घेऊन सर्व कार्यालयांनी तत्काळ आवश्यक त्रुटी दूर करून परिपूर्ण अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी आज येथे दिले.

शासनाच्या १०० दिवस कृती कार्यक्रमातील अंमलबजावणीचा आढावा पालकमंत्र्यांनी ऑनलाइन बैठकीद्वारे घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, तसेच सर्व विभागप्रमुख, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदी उपस्थित होते.

Maharashtra Medical Council : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची आज निवडणूक

पालकमंत्री ॲड. फुंडकर म्हणाले की, सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे (इज ऑफ लिव्हिंग) यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनासाठी सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित केला आहे. अद्ययावत संकेतस्थळे, सुकर जीवनमान, स्वच्छता, जनतेच्या तक्रारींचे निवारण, कार्यालयातील सोयीसुविधा, गुंतवणूक प्रसार आणि क्षेत्रीय कार्यालयांना भेटी या सातही उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी सर्व कार्यालयांनी समन्वय साधून प्रयत्न करावेत. या कार्यवाहीचे परीक्षण क्वालिटी कौन्सिलकडून करण्यात येणार असून, आपण स्वतःही पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कुंभार म्हणाले की, कृती कार्यक्रमाच्या तयारीच्या अनुषंगाने जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात अभियांत्रिकी विद्यार्थ्यांकडून कार्यालयांचे मूल्यमापन करून घेण्यात आले. कार्यालयांची संकेतस्थळे अद्ययावत करण्यात आली आहेत. प्राप्त अर्ज व तक्रारीवरील कार्यवाहीची माहिती अर्जदाराला मिळण्यासाठी ‘ई-ऑफिस टपाल ट्रॅकर’ विकसित करण्यात आला आहे. स्वामित्व योजनेअंतर्गत शिबिरांद्वारे ७५० प्रलंबित प्रकरणे निकाली काढून सनदवाटप करण्यात आले.

ते पुढे म्हणाले की, ई-ऑफिस कार्यप्रणाली तलाठी व मंडळ कार्यालयांच्या स्तरावरही विकसित केली जात आहे. तालुका स्तरावर साप्ताहिक तक्रार निवारण दिनाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. कार्यालयांची स्वच्छता, अभ्यागतांसाठी सुविधा, माहिती फलक आदींसाठी कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वापरातून कामकाज अधिक प्रभावी, जलद व अचूक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याच अनुषंगाने ‘ई-कोतवालबुक’ हा उपक्रमही राबविण्यात येणार आहे.

Wardha Mahavitaran : ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्यांना मिळणार स्मार्ट फोन !

तक्रार निवारण प्रणालीच्या अनुषंगाने सर्व पोलीस ठाण्यांच्या समावेशासह केंद्रीकृत डेटाबेस तयार केला जात आहे. त्यामुळे तक्रारींचा मागोवा घेणे तसेच जलद निपटारा करणे शक्य होईल, असे पोलीस अधीक्षक सिंह यांनी सांगितले.