Farmers will protest for loan waiver : तहसील कार्यालयावर ११ एप्रिलला धडकणार; क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा इशारा
Buldhana महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याचे जाहीर आश्वासन दिले होते. मात्र, सरकार स्थापन होऊन तीन महिने उलटले तरीही अद्याप सरसकट कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी ११ एप्रिल रोजी लोणार तहसील कार्यालयावर “कर्जमाफीची वारी” काढण्याचा इशारा दिला आहे.
सहदेव लाड यांनी तहसीलदारामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदन सादर केले आहे. या निवेदनावर अनिल लांडगे, शिवाजी वाघमारे, कैलास गीते, ऋषिकेश कापकर यांच्यासह अन्य शेतकरी नेत्यांच्या सह्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांनी निवडणुकीपूर्वी जाहीर केले होते की, महायुतीचे सरकार आल्यास शेतकऱ्यांची संपूर्ण सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा केला जाईल. परंतु सरकार स्थापन होऊन काही महिने झाले, तरीही या आश्वासनावर अंमलबजावणी झालेली नाही.
Akola Industrial Development : गुंतवणूक परिषद ठरली ‘मास्टर स्ट्रोक’!
त्याउलट, उपमुख्यमंत्री अजित पवार DCM Ajit Pawar यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात “शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी आपले कर्ज फेडावे”, असे वक्तव्य करून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे. त्यामुळे राज्यभरातील शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे.
शेतकऱ्यांना वेळोवेळी आलेल्या नैसर्गिक आपत्ती, तसेच सोयाबीन आणि कापसाला न मिळालेला हमीभाव यामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून आश्वासने दिली जात असली तरी प्रत्याक्षात अंमलबजावणी होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले, ही बाब अतिशय गंभीर असल्याचे सहदेव लाड यांनी निवेदनात नमूद केले आहे.
Akola Industrial Development : गुंतवणूक परिषद ठरली ‘मास्टर स्ट्रोक’!
सहदेव लाड यांनी दिलेल्या निवेदनात स्पष्ट चेतावणी देण्यात आली आहे की,
“सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा ११ एप्रिल रोजी लोणार तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात येईल.”