BJP alleges that theatrics are being done over the issue of ward-list corrections : भाजप नेते विजय अग्रवाल यांचा आरोप, नागरिकांच्याही तक्रारी
Akola अकोला महानगरपालिका क्षेत्रातील अनेक प्रभागांमध्ये मतदार यादी तयार करताना काही मतदार चुकीच्या प्रभागात जोडल्या गेल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. संबंधित तक्रारींमध्ये तथ्य असल्यास दुरुस्ती करण्यासाठी मनपा निवडणूक विभाग पूर्णपणे तयार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते. मात्र, या मुद्द्यावर काँग्रेस, महाविकास आघाडी आणि उभाठा सेनेचे नेते केवळ स्टंटबाजी करून स्वस्तातील लोकप्रियता मिळवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत असल्याचा आरोप माजी महापौर आणि भाजप नेते विजय अग्रवाल यांनी केला.
अग्रवाल म्हणाले, “प्रभाग रचना आणि मतदार यादी तयार करताना किरकोळ चुका होणे स्वाभाविक आहे. त्या दुरुस्ती करणे हे प्रशासनाचे काम आहे. तक्रार देऊन पुराव्यांच्या आधारे दुरुस्ती करण्याची अधिकृत पद्धत असताना काँग्रेस आणि महाविकास आघाडी मुद्दाम गोंधळ उभा करत आहेत.”
Local Body Elections : महिलाशक्ती ठरणार ‘गेम चेंजर’, ‘पिंक बूथ’द्वारे महिलांचा सन्मान
शहरातील सुमारे २० प्रभागांपैकी काही प्रभागांमध्ये चुकीची नोंद झाल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. त्या तपासून दुरुस्ती करण्याची प्रक्रिया मनपा प्रशासनातर्फे सुरू आहे. मतदार यादी वाचन, पुरावे सादर करणे आणि निवडणूक विभागाकडे अधिकृत तक्रार देणे – ही प्रक्रिया ठरलेली असताना त्याकडे दुर्लक्ष करून “प्रशासनावर दबाव आणण्याचा आणि आम्हीच मतदारांचे खरे हितचिंतक आहोत असा दिखावा करण्याचा प्रयत्न काँग्रेस-आघाडी करीत आहे,” असा आरोप अग्रवाल यांनी केला
Mahayuti Governemt :आर.आर. आबांच्या संकल्पनेतील या योजनेचा सरकारला विसर
ते पुढे म्हणाले, “मतदारांची वृत्ती, प्रवृत्ती आणि उद्देश लक्षात घेऊन कर्मचारी याद्या तयार करतात. कोणत्याही मतदारावर अन्याय होऊ नये याची पूर्ण दक्षता घेतली जाते. तक्रार आल्यावर दुरुस्ती करूनच याद्या प्रकाशित केल्या जातात. त्यामुळे अशा प्रकारची नाटकी भूमिका हे पराभवाचे पूर्वसंकेत आहेत. काँग्रेस आणि महाविकास आघाडीला आगामी निवडणुकीतील पराभवाची भीती वाटत असल्यामुळे ते अशा प्रकारे वातावरणनिर्मिती करत आहेत.”








