Amravati Airport : ऑक्टोबरपर्यंत नाईट लँडिंगची शक्यता!

Night landings may start from October : प्रवासी विमानसेवा १६ एप्रिलपासून, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री येणार

Amravati अमरावती विमानतळावरून प्रवासी विमानसेवेचा शुभारंभ येत्या १६ एप्रिल रोजी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे DCM Eknath Shinde व अजित पवार Ajit Pawar आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे Chandrashekhar Bawankule यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. ऑक्टोबरपर्यंत या विमानतळावर नाईट लँडिंग (रात्री विमान उतरणे) सुविधा सुरू होण्याची शक्यता आहे, अशी माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या MADC उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे Swati Pande यांनी पत्रकार परिषदेत दिली.

स्वाती पांडे म्हणाल्या, “नाईट लँडिंगसाठी आवश्यक प्रणाली जूनपर्यंत कार्यान्वित केली जाईल. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची (DGCA) परवानगी मिळाल्यानंतर ऑक्टोबरपर्यंत ही सुविधा उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे.” तसेच, आयएफआर (इन्स्ट्रुमेंट फ्लाइट रूल्स) आणि सर्व हवामानात विमान चालवण्यास अनुमती मिळवण्यासाठी डीजीसीएकडे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत.

Ravi Rana : १११ फूट उंच हनुमान मूर्ती, उभारणी अंतिम टप्प्यात !

अमरावती विमानतळाला सार्वजनिक वापरासाठी अधिकृत एअरोड्रम परवाना प्राप्त झाला आहे. १९९२ मध्ये या विमानतळाच्या विकासाला ‘ब्राऊनफिल्ड प्रकल्प’ म्हणून सुरुवात झाली होती. आज, प्रादेशिक हवाई संपर्क योजना (उडान) अंतर्गत येथे प्रवासी सेवा सुरू होत असल्याचा आनंद आहे, असे पांडे यांनी सांगितले.

विमानतळाचे एकूण क्षेत्रफळ ४११ हेक्टर असून १८५० मीटर लांब आणि ४५ मीटर रुंद धावपट्टी तयार करण्यात आली आहे. टर्मिनल इमारत २६०० चौरस मीटरमध्ये उभारली असून, ती एकावेळी २०० प्रवाशांची क्षमता सांभाळू शकते. २६ मीटर उंचीचा एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवरही बांधण्यात आला आहे. एकाचवेळी दोन एटीआर-७२ प्रकारची विमाने येथे थांबू शकतात.

हे विमानतळ विदर्भासाठी महत्त्वाचे ठरणार असून, येथून भविष्यात सुरत व अहमदाबादसारख्या शहरांसाठीही विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल. हा प्रकल्प केवळ पायाभूत सुविधा नाही, तर औद्योगिक, व्यापार आणि पर्यटन विकासासाठीही महत्त्वाचा टप्पा ठरेल, असेही पांडे यांनी स्पष्ट केले.

Ganesh Naik : धोटीवाडा येथुन जंगल सफारी सुरु करा

विमानसेवेच्या उद्घाटनासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. विमानसेवा सुरू झाल्यानंतर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी व्यक्त केला.