Manoj Jarange is frustrated said Ashish Jaiswal : आशिष जयस्वाल यांची टीका; शिवसैनिकांतर्फे स्वागत सोहळा
Jarange बीड सरपंच हत्या प्रकरणावरून मनोज जरांगे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा खणखणीत इशारा दिला होता. यावर राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी जोरदार टीका केली. मनोज जरांगे हे वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांच्या बोलण्याला फारसे महत्त्व देऊ नका, असे जयस्वाल म्हणाले. शनिवारी (दि. ४ जानेवारी) ते गोंदिया Gondia जिल्ह्याच्या दाैऱ्यावर आले असता माध्यमांशी बोलत होते.
बीड प्रकरणात महायुतीचे नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती. यावर बोलताना राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विरोधकांना टोला लगावला. प्रत्येक गोष्टीचे राजकीय भांडवल करायचे नसते. बीड प्रकरणामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः लक्ष देत आहेत, असं जयस्वाल म्हणाले.
या प्रकरणाची चौकशी एसआयटी आणि सीआयडीकडून सुरू आहे. काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. यातील दोषींवर निश्चितच कठोर कारवाई केली जाईल. विरोधकांनी याचे अधिक भांडवल करण्यापेक्षा इतर मुद्द्यांकडे लक्ष द्यावे, असा टोलादेखील लगावला.
Question of abandoned bodies : वर्षभरात २५ मृतदेहांवर प्रशासनाकडून अंत्यसंस्कार!
शिवसैनिकांनी केले स्वागत
शिंदेसेनेचे आमदार व राज्यमंत्री आशिष जयस्वाल ४ जानेवारीला गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांचे गोंदिया येथे आगमन झाले त्यावेळी बाईक रॅली काढत शिवसैनिकांनी जंगी स्वागत केले. आशिष जयस्वाल मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. शिंदेसेना जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे व शिवसैनिक उपस्थित होते.
Nagpur airport : विमानतळ विस्तरिकरणातून उद्योगांना ‘बूस्टर डोस’
शिवसैनिकांसोबत साधला संवाद
जयस्वाल यांनी जिल्ह्यातील शिंदेसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह संवाद साधला. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी त्यांची कलार समाजबांधवांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. निवेदन देऊन त्यांच्यासह चर्चा केली.