Buldhana Congress : चिखली काँग्रेसमध्ये अंतर्गत उठाव; ‘निष्ठा’ आणि ‘पद’ यांच्या संघर्षात घडी विस्कटली

chikhli-congress-internal-conflict-over-co-opted-member-and-group-leader-selection : गटनेतेपद आणि स्वीकृत सदस्य निवडीवरून ‘लेटर वॉर’; शहराध्यक्षांच्या राजीनाम्यामुळे पक्ष संकटात

Chikhli चिखली नगरपरिषदेच्या सत्तेत वाटा मिळवण्यासाठी सुरू असलेल्या राजकीय खेळींमुळे काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत. गेल्या काही दिवसांत घेण्यात आलेल्या दोन महत्त्वाच्या धोरणात्मक निर्णयांमुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, पक्षाची संघटनात्मक घडी पूर्णपणे विस्कटल्याचे चित्र आहे.

सत्तेसाठी इतर पक्षांच्या मदतीने निवडणूक लढविणाऱ्यांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप करत, निष्ठावान कार्यकर्त्यांनी आता थेट बंडाचा झेंडा हाती घेतल्याने चिखली काँग्रेसमध्ये मोठी राजकीय पोकळी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून सुरू झालेला वाद आता गटनेतेपद आणि स्वीकृत सदस्य निवडीपर्यंत पोहोचला आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारीला बगल देऊन इतर पक्षांच्या पाठिंब्यावर निवडणूक लढविणाऱ्यांना पक्षात महत्त्वाचे स्थान दिले गेल्याने, वर्षानुवर्षे पक्षाचे झेंडे खांद्यावर घेणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी अधिकच तीव्र झाली आहे.

Indian Railway : दक्षिण आणि उत्तर भारताला जोडणाऱ्या खंडवा-अकोला रेल्वे मार्गाला वेग; २०२७ ची ‘डेडलाईन’

विशेषतः राष्ट्रवादीकडून निवडून आलेल्या सदस्यांना काँग्रेसचे गटनेतेपद बहाल करण्याच्या निर्णयामुळे पक्षांतर्गत लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या निर्णयांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना व्यक्त करत, अनेक नगरसेवकांनी उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली आहे.

स्वीकृत सदस्यपदाच्या निवडीनंतर या वादाने टोक गाठले असून, चिखली शहराध्यक्षांच्या राजीनाम्यापर्यंत ही परिस्थिती पोहोचली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचा प्रभाव या निर्णयांवर असला, तरी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन करण्यात नेतृत्व अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.

Farmers loan waiver : राज्यभरात कर्जमाफीच्या निर्णयाकडे लक्ष; नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण

जिल्हा स्तरावरून संघटना मजबूत करण्याऐवजी गटबाजीला खतपाणी घातले जात असल्याचा आरोप नाराज गटाकडून केला जात आहे. काही महत्त्वाचे पदाधिकारी आता पक्ष सोडण्याच्या तयारीत असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी ही गळती रोखणे प्रदेश नेतृत्वासमोर मोठे आव्हान ठरणार आहे.