Breaking

Cabinet meeting : कॅबिनेटमध्ये उन्हाळी पिकांच्या नुकसानाचा आढावा !

Government will acquire buffer zone lands under Mukhyamantri Saur Urja Vihir Yojana : बफर झोनच्या जमिनी सरकार भाडेतत्वावर घेणार

Nagpur : पावसाळा सुरू झाला, पण अद्यापही विदर्भात पावसाची प्रतीक्षा आहे. मृग नक्षत्र ७ जूनला सुरू होते. त्यानंतर तर पाऊस आला नाही. पण मृग नक्षत्र्याच्या पूर्वीच पावसाने थैमान घातले होते. जणू काही शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त करण्याचेच निसर्गाने ठरवले होते की काय, असे वाटावे येवढा पाऊस त्या दोन आठवड्यात झाला. आजच्या (ता. १७ जून) मंत्रिमंडळाच्या बैठकीत पावसाने झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यात आला आहे.

गेल्या महिन्यात झालेल्या पावसाने उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये बागायती शेतींनाही जबर फटका बसला. मुख्यमंत्र्यांनी मागील मंत्रिमंडळ बैठकीत या नुकसानाचा आढावा घेतला होता. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही पावसाने झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून देण्यासाठी शासन पुढाकार घेईल आणि लवकरच पंचनामे करून नुकसान भरपाई दिली जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

Cabinet meeting : शेतीसाठी AI धोरण, धारावी पुनर्विकास, ग्रामपंचायत स्तरावर हवामान केंद्र

मानव वन्यजीव संघर्ष कमी होणार..
विदर्भाच्या जंगलव्याप्त जिल्ह्यांमध्ये मानव-वन्यजीव संघर्ष टोकाला पोहोचला आहे. रोजच कुठे ना कुठे वन्यप्राण्यांचे हल्ले होत आहेत. वनक्षेत्राला लागून असलेल्या शेतांमध्ये काम करणे कठीण होऊन बसले आहे. यावर शासनाने एक उपाय काढला आहे. वनक्षेत्राला लागून असलेल्या जमिनी बफर जोनमध्ये असलेल्या जमिनी ५० हजार रुपये प्रतिएकर या दराने मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेअंतर्गत घेण्यात येणार आहेत.

Eknath shinde : जनता घरात बसणाऱ्यांच्या नाही, काम करणाऱ्यांच्या पाठिशी

ताब्यात घेतलेल्या जमिनीवर बांबूची लागवड करून ग्रास लँड डेव्हलपमेंट केली जाणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी वन्य प्राण्यांच्या शिकारीचे प्रमाण कमी होईल आणि शेतकरी व शेतमजुरांच्या जिवाचा धोका कमी होईल. लवकरच यासंदर्भात जीआर काढण्यात येणार असल्याचीही माहिती आहे. सर्व बफर झोनच्या जमिनी भाडेतत्वावर घेण्याची तयारी सरकारने सुरू केली असल्याचे सांगण्यात आले आहे.