Former MP visits Bachchu Kadu’s protest site : छत्रपती संभाजीराजेंचा इशारा; बच्चू कडू यांच्या आंदोलनाला दिली भेट
Amravati “बच्चू कडू यांची प्रकृती खालावली, तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल,” असा तीव्र इशारा राज्यसभेचे माजी खासदार व महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांनी दिला. गुरुकुंज मोझरी येथे सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनस्थळी त्यांनी प्रत्यक्ष भेट देत सरकारवर कठोर शब्दांत टीका केली.
शेतकरी कर्जमाफीसह १७ प्रमुख मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी ८ जूनपासून गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीपुढे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी संभाजीराजे यांनी त्यांची भेट घेतली.
“महायुतीचे सरकार स्वत:ला सर्वसामान्यांचे सरकार म्हणवते, मग बच्चू कडू वेगळ्या लोकांसाठी लढत आहेत काय? त्यांची मागणी चुकीची आहे काय? या प्रश्नांवर सरकारने तातडीने चर्चा व निर्णय घेतला पाहिजे,” असे संभाजीराजे म्हणाले.
Akola Police : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात शिस्तबद्ध बंदोबस्त, पोलिसांचे कौतुक
संभाजीराजे छत्रपती यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरही ताशेरे ओढले. “कोट घालून फिरणाऱ्या कृषिमंत्र्यांनी केवळ फोनवर संपर्क साधला आहे, पण ही कृती करण्याची वेळ आहे. बच्चू कडू यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे. सरकारने ही वेळ गमावू नये,” असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला.
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांचा पुढाकार अन् चंद्रपूर होणार Honey Hub!
“छत्रपती शिवरायांचे राज्य हे रयतेचे होते. त्यांच्या वंशज म्हणून मी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे. महाराष्ट्रातील कष्टाळू शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा घेऊ नका, अन्यथा येथेही पंजाबसारखी परिस्थिती निर्माण होईल,” असा इशाराही त्यांनी दिला.