Breaking

CM Devendra Fadnavis : धोत्रा नंदाईसह १४ गावांना पाणी मिळणार!

 

14 villages including Dhotra Nandai will get water : संत चोखासागर खडकपूर्णा प्रकल्पातून व्यवस्था, मुख्यमंत्र्यांचे आदेश

Buldhana देऊळगाव राजा तालुक्यातील जीवनवाहिनी असलेल्या खडकपूर्णा नदीवरील संत चोखासागर धरणाच्या उपकालव्यांच्या लाभ क्षेत्रातील धोत्रा नंदाईसह 14 गावांना सिंचनासाठी पाणी मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांनी या संदर्भात संबंधित विभागाला तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

आमदार मनोज कायंदे यांनी यासंदर्भात प्रस्ताव मांडला होता. दोन दिवसांपूर्वी त्यांनी बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन या समस्येवर चर्चा केली होती.

खडकपूर्णा धरणाच्या उपकालव्यांमधून सुमारे 1673 हेक्टर जमिनीवरील सिंचनाचा प्रश्न विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या काही ठरावांमुळे निर्माण झाला होता. संबंधित लाभधारकांनी या क्षेत्राला वगळण्याची मागणी केली होती. त्यामुळे पाणी उपलब्ध असूनही गावांना पाणी मिळत नव्हते. शेतकऱ्यांमध्ये या कारणामुळे तीव्र नाराजी होती.

CM Devendra Fadnavis : आयआयएम नागपूरची Net Zero कडे वाटचाल!

शेतकरी आणि उजवा कालवा कृती समिती यांच्या वतीने 2008 पासून आंदोलने, मोर्चे आणि उपोषणाद्वारे पाण्याच्या मागण्या करण्यात येत होत्या. या मागण्यांवर तातडीने विचार करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित विभागाला तत्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले.

शेतकऱ्यांच्या पाणीप्रश्नासाठी लढणारे कैलास नागरे यांनी आपल्या जीवनाचा त्याग केला. त्यांच्या बलिदानाची जाण ठेवून आ. मनोज कायंदे यांनी हा विषय मार्गी लावण्याचा निर्धार केला होता. आता हा प्रश्न सुटल्याने कैलास नागरे यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे आमदार कायंदे यांनी सांगितले.

Minister Gulabrao Patil : जलजीवन मिशनचे काम पूर्ण करा, नाही तर…

धोत्रा नंदाई, अंधेरा व इतर 14 गावांना संत चोखासागर खडकपूर्णा प्रकल्पातून पाणी उपलब्ध झाले तर या गावातील सिंचनाचा आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल. याचा फायदा परिसरातील समस्त नागरिकांना होईल, असा विश्वास कायंदे यांनी व्यक्त केला.