Breaking

CM Devendra Fadnavis : प्रत्येक विद्यापीठात दिव्यांग संशोधन केंद्र!

 

Disability Research Center in each university : मुख्यमंत्र्यांचा शब्द; बच्चू कडूंनी केली होती मागणी

Amravati रायगड येथील दिव्यांग बांधवांच्या मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध मागण्यांवर सकारात्मक भूमिका स्पष्ट केली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक विद्यापीठात आता दिव्यांग संशोधन केंद्र स्थापन करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात फडणवीस यांच्या अध्यक्षतेत दिव्यांगांच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक झाली. या बैठकीत २२ प्रमुख मागण्यांवर चर्चा झाली. त्यापैकी १९ मागण्या मंजूर करण्यात आल्या आहेत:

२०१६ च्या कलम ८८ नुसार अर्थसंकल्पातील ५% निधी दिव्यांगांवर खर्च केला जावा यासाठी तपासणी करून अहवाल सादर केला जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिव्यांगांसाठी खर्च होणारा ५% निधी लेखापरीक्षणात समाविष्ट केला जाणार आहे. दिव्यांग बचत गट व सहकारी संस्थांसाठी विशेष योजना आखण्यात येणार आहे.

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांसाठी Good News!

दिव्यांग साहित्य वाटप करताना रोजगारपुरक आणि रोगमुक्त साहित्य देण्यात येईल. तर दिव्यांगांसाठी स्वतंत्र रोजगार, उद्योग व स्टॉल धोरण राबवण्यात येणार आहे. आशा वर्कर, अंगणवाडी मदतनीस, कोतवाल, पोलीस पाटील यांच्या भरतीमध्ये दिव्यांग उमेदवारांना १० गुणांची सवलत दिली जाणार आहे.

CM Devendra Fadnavis : NMRDA चे मेगा बजेट, मुख्यमंत्र्यांचे Green Signal!

विशेष म्हणजे प्रत्येक विद्यापीठात दिव्यांग संशोधन केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. मूकबधिर विद्यार्थ्यांना दहावीनंतर उच्च शिक्षणाची सुविधा व वाहन परवाना देण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. अंध विद्यार्थ्यांसाठी विशेष सॉफ्टवेअर आणि अडथळामुक्त शिक्षणाची व्यवस्था केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांना अख्खं राज्य हवय cataract free !

याशिवाय, मृत्य दिव्यांगांची कर्जमाफी करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. सुमारे ६ कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्ज माफ करण्यात आले आहे. शेतकरी कर्जमाफीस नकार दिला गेल्यामुळे आणि दिव्यांग मानधन ६००० रुपये करण्याच्या मागणीस प्रतिसाद न मिळाल्यामुळे राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्धार बच्चू कडूंनी केला आहे.