Breaking

Crises on India : देवदर्शन, पर्यटनस्थळे बेतताहेत जिवावर… देशावर एकापाठोपाठ संकटे !

 

Pilgrims, tourist spots are becoming dangerous, many people’s travel plans are canceled : केदारनाथ येथे सर्वाधिक चार अपघात

Nagpur : २०२५ हे वर्ष महाराष्ट्रासाठी आणि एकंदरच देशासाठी दुर्घटनांची मालिका घेऊन आले. जवळपास अर्ध वर्ष संपत आलं. साडेपाच महिन्यांच्या या काळात हादरवून टाकणाऱ्या घटना घडल्या आहेत. यामध्ये देवदर्शन आणि पर्यटन स्थळे लोकांच्या जिवावर बेतत असल्याचे बघायला मिळाले आहे. देशावर एका पाठोपाठ एक संकटे येत आहेत. यामध्ये सर्वस्वी सरकारला दोष देणे पूर्णपणे योग्य नाही, तर सर्वांनी धिराने या संकटांचा सामना करण्याची गरज आहे.

या वर्षातील देशावरील सर्वात मोठे संकट म्हणजे जम्मू काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला. या हल्ल्याने भारत देशच नव्हे तर अख्खं जग हादरलं. त्यानंतर १५ दिवसांतच भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देऊन सळो की पळो करून सोडलं. तेव्हा विरोधकही सत्ताधाऱ्यांसोबत दटून उभे राहिले. सुदृढ लोकशाहीचं दर्शन तेव्हा जगाला घडलं. भारताची भूमिका मांडण्यासाठी देशभरात खासदार गेले. यामध्ये सर्वपक्षीय लोकांचा समावेश होता. ही एक चांगली गोष्ट झाली.

Indrayani bridge collapsed : ‘ती’ एक चूक केली नसती, तर पूल कोसळला नसता !

केदारनाथ येथे दर्शनासाठी गेलेल्या भाविकांसोबत अपघात झाले. यावर्षीच्या पहिल्या घटनेत सहा लोकांचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या घटनांमध्ये हेलिकॉप्टरचे इमरजन्सी लॅंडींग करण्यात आले. पायलटच्या प्रसंगावधानाने कुठलीही जिवीत हानी झाली नाही. या अपघाताच्या ऋंखलेत आज (ता. १५ जून) पहाटे झालेला अपघात फार गंभीर होता. यामध्ये सात जण ठार झाले. यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथील जयस्वाल  कुटुंबातील तिघे जणे यामध्ये मृत्युमुखी पडले.

The bridge collapsed : मावळात पूल कोसळून दोन ठार, काही वाहून गेले, एनडीआरएफला पाचारण !

आढवडाभरापूर्वी मनाली येथे नागपूरच्या प्रफुल्ल बिजवे यांची मुलगी झिप लाईन अॅडव्हेंचर अक्टीव्हीटी करत असताना केबल तुटल्यामुळे ३० फूट उंचीवरून खाली कोसळली. यामध्ये तिच्या पायांना अनेक गंभीर फ्रॅक्चर झाले. सुदैवाने तिचा  जीव वाचला. या वृत्ताची शाई वाळते न वाळत तोच पुणे जिल्ह्यातील मावळ येथे इंदोरीनजिक इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला तर २० ते २५ जण वाहून गेल्याची माहिती आहे. देशासह महाराष्ट्रावर एकापाठोपाठ एक संकटे येत आहेत.

Pandharpur Darshan : अवघ्या एक तासात होणार आता विठुरायाचे दर्शन

उपरोक्त सर्व घटनांनाचा विचार केला असता एक मावळची घटना सोडल्यास सर्व जण देवदर्शन आणि पर्यटनासाठी गेलेले होते. त्या स्थळांवर काहींचा जीव गेला, तर काही थोडक्यात बचावले. त्यामुळे आता लोक देवदर्शन आणि पर्यटनाला जाण्याच्या नावानेच धास्तावलेले दिसतात. ‘हे वर्ष काही चांगले नाही, पुढच्या वर्षी बघू..’, असे म्हणत अनेकांनी पर्यटन आणि देवदर्शन लांबणीवर टाकल्याचे बघायला मिळत आहे.

  • अतुल मेहेरे (विशेष प्रतिनिधी)

    अमरावती विद्यापीठातून पत्रकारीतेची पदवी. २६ वर्षांपासून पत्रकारीतेमध्ये कार्यरत. सन २००० पासून लोकमत आणि सकाळ वृत्तपत्र समुहामध्ये विविध पदांवर कार्य केलेले आहे. दैनिक सकाळच्या सरकारनामा या वेब पोर्टलसाठी राजकीय प्रतिनिधी म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.