95 infants die in 14 months : गर्भावस्थेतील आजार ठरताहेत कारणीभूत
Wardha बाळाचा जन्म होणे, ते रुग्णालयातून घरी येणे हा सगळ्याच पालकांसाठी आनंदाचा क्षण. पण, काहीवेळा आईच्या पोटातच बाळ दगावते. तो क्षण पालकांसाठी वेदनादायी असतो. गेल्या १४ महिन्यांमध्ये दुर्दैवाने ९५ बालकांचा उपजत मृत्यू stillbirth झाला. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्याच्या अपुऱ्या सुविधांचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.
गर्भावस्थेतील विविध आजार हेदेखील उपजत मृत्यूचे कारण ठरत आहे. मागील काही वर्षांत वैद्यकीय व्यवस्था अनेक ठिकाणी पोहोचल्याने अशा पद्धतीने मृत बाळ जन्माला येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पण, काही ठिकाणी थोड्या प्रमाणात का होईना, शहरांसह जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांत मृत बाळ जन्माला येण्याचे प्रमाण असते.
Maharashtra State Seed Corporation : महाबीजमध्ये कामगार नसल्याचा शेतकऱ्यांना फटका!
जिल्ह्यात मागील १४ महिन्यांत १५ हजार १७ महिलांची प्रसूती झाली. यात ७ हजार ७०३ मुले तर ७ हजार ३६५ मुलींचा जन्म झाला आहे. यामध्ये ९५ बालकांचा उपजत मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये आरोग्याच्या अपुऱ्या सुविधा आहेत. त्यामुळे गंभीर स्थितीमध्ये अनेक गर्भवती महिलांना ग्रामीण भागातून शहरात प्रसूतीसाठी रेफर केले जाते.
त्यामुळे प्रवासादरम्यान अनेक गर्भवती व तिच्या पोटातील बाळाची प्रकृती गंभीर होते. त्यामुळेही अनेक महिलांचे बाळ हे मृत जन्माला येते. गरोदरपणात आरोग्याची कुठलीही समस्या निर्माण झाल्यास स्वत:हून कोणतीही औषधे घेऊ नयेत. कारण, ती तुमच्या पोटातील बाळास हानी पोहोचवू शकतात. गरोदरपणात सर्व औषधोपचार डॉक्टरी सल्ल्यानेच करावा.
जुन्या आजारांसाठीही डॉक्टरांना विचारून कोणती औषधे घेऊ शकतात तीच घ्यावीत. गरोदर महिलेने नियमितपणे स्त्रीरोगतज्ज्ञांकडे तपासणी करावी. मधुमेह, रक्तदाबाचा त्रास असेल तर संबंधित डॉक्टरांकडून तपासण्या करून औषधोपचार करावेत. डॉक्टरांनी सुचविल्याप्रमाणे सोनोग्राफी वेळच्या वेळी करून घ्याव्यात. प्रसूती ज्या ठिकाणी करणार आहात, त्या दवाखान्यात नावनोंदणी करून ठेवावी, अशा सूचना प्रशासनातर्फे देण्यात येतात.
MLA Sameer Kunawar : १७५ कोटी रुपयांचा खर्च, रस्ता पूर्ण होण्यापूर्वीच ऐशीतैशी!
एकूण उपजत मृत्यूपैकी अनेक मृत्यू हे प्रसूतीदरम्यान होतात. जर गर्भवती महिलांनी वेळीच आवश्यक तपासण्या केल्या, तर हे चित्र टाळता येऊ शकते. गर्भधारणेमध्ये महिलेने आपल्या आहाराकडेही विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.