Indian Railway : दक्षिण आणि उत्तर भारताला जोडणाऱ्या खंडवा-अकोला रेल्वे मार्गाला वेग; २०२७ ची ‘डेडलाईन’

khandwa-akola-railway-gauge-conversion-project-update-2026 : १० राज्यांमधील दळणवळण होणार सुसह्य; तापी नदीवरील महाकाय गर्डरचे काम यशस्वीपणे पूर्ण

Akola देशातील १० राज्यांना थेट जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा खंडवा–अकोला–इंदूर–रतलाम–चित्तोडगढ–मारवाड जंक्शन या रेल्वे मार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. दक्षिण आणि उत्तर भारताला जोडणारा हा प्रकल्प दळणवळणाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणार असून, २०२७ पर्यंत संपूर्ण मार्ग वाहतुकीसाठी सज्ज करण्याचा संकल्प रेल्वे प्रशासनाने केला आहे. सध्या सिकंदराबाद ते अकोट आणि अकोट ते हिवरखेड या टप्प्यांवरील रेल्वे रुळांचे काम युद्धपातळीवर सुरू असून, या मार्गावरील विद्युतीकरणाच्या प्रक्रियेनेही वेग घेतला आहे.

खंडवा–अकोला गेज परिवर्तन प्रकल्पांतर्गत तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक असलेली कामे यशस्वीपणे पूर्ण केली जात आहेत. अलीकडेच मध्य प्रदेशातील आमलाखुर्द–तुकाईथड दरम्यान तापी नदीवर प्रत्येकी ७६.२ मीटर लांबीचे चार ‘ओपन वेब गर्डर’ (OWG) बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्यामुळे प्रकल्पातील मोठा अडथळा दूर झाला आहे. सध्या केवळ अकोट ते आमलाखुर्द या वनक्षेत्रातून जाणाऱ्या टप्प्याचे काम शिल्लक असून, तांत्रिक आणि पर्यावरणीय बाबींची पूर्तता करून या कामाला गती दिली जात आहे. इंदूर–रतलाम आणि चित्तोडगढ–मारवाड जंक्शन यांसारख्या इतर उप-मार्गांचे काम आधीच पूर्ण झाले असल्याने, आता सर्वांचे लक्ष अकोला–अकोट टप्प्याकडे लागले आहे.

Farmers loan waiver : राज्यभरात कर्जमाफीच्या निर्णयाकडे लक्ष; नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण

या रेल्वे प्रकल्पामुळे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पंजाब आणि दिल्लीसह दक्षिण भारतातील विविध राज्ये थेट ब्रॉडगेजने जोडली जाणार आहेत. विशेषतः विदर्भातून इंदूर आणि राजस्थानकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा मार्ग अत्यंत सोयीचा ठरणार असून, प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. हिवरखेड ते तुकाईखेड दरम्यानचे भूमी अधिग्रहण आणि प्रत्यक्ष बांधकामाचे नियोजन रेल्वे प्रशासनाकडून सूक्ष्मपणे केले जात आहे. अकोला–अकोट रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणामुळे या मार्गावर भविष्यात जलदगती गाड्या चालवणे शक्य होणार आहे.

Rajya Sabha Election 2026 : राज्यसभेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी; ‘निष्ठावंत’ विरुद्ध ‘आयाराम’ वाद पेटणार?

केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाने या प्रकल्पाला विशेष प्राधान्य दिले असून, दक्षिण मध्य रेल्वेमार्फत निधीचा पुरवठा आणि कामाचा दर्जा यांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. लोकप्रतिनिधींच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि प्रशासकीय समन्वयामुळे हा प्रकल्प आता निर्णायक स्थितीत आला आहे. २०२७ मध्ये हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर व्यापारी वाहतुकीलाही मोठी चालना मिळणार असून, मध्य भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी हा रेल्वे मार्ग एक ‘लाईफलाईन’ ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.