We started messing around in the house Jayant Patil got angry : सभागृहात समजावून सांगितले कामकाजाचे नियम
Mumbai : सभागृहामध्ये विरोधी पक्षातील सदस्यांना त्यांचे म्हणणे मांडले जाऊ देत नाही. विधानपरिषदेचे सभापती आणि विधानसभेतील अध्यक्षांकडून दुजाभाव केला जातो. विरोधी पक्षाच्या सदस्यांवर सभागृहामध्ये अन्याय सुरू आहे, अशी तक्रार घेऊन विरोधी पक्षाचे नेते काल (२० मार्च) राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना भेटले. तक्रारीचे पत्रही राज्यपालांना दिले. त्यानंतर आज सभागृहाच्या कामकाजात सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण ही अपेक्षा फोल ठरल्याची विरोधी पक्षातील सदस्यांची भावना झाली आहे.
सभागृहात नियमबाह्यपणे चालवल्या जाणाऱ्या कामकाजावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील चिडले. त्यांनी नियम सांगत तालिका अध्यक्षांवर अक्षरशः प्रश्नांची सरबत्ती केली. ते म्हणाले, एका दिवशी तीन पेक्षा जास्त लक्षवेधी घेऊ नये, असे १०५ मध्ये नियम सांगतो. प्रत्येक लक्षवेधीला १० मिनीटे द्यावी, असेही आपल्या नियमावलीच्या पुस्तकात नमूद आहे. आज आपण तब्बल ३५ लक्षवेधी घेतल्या. काल २० लक्षवेधी घेतल्या. काय.. हे चाललंय काय?
Chandrashekhar Bawankule : होय..! जयंत पाटलांना माझ्या बंगल्यावर भेटलो, पण..
सदस्यांनी लक्षवेधी टाकल्यावर प्रिंटेड उत्तर शेवटच्या दिवशी यावं. अशा निवेदनावर समाप्त होण्याच्या दिवशी शिल्लक राहिल्यास संबंधित मंत्री त्यावर करायवयाची निवेदने पटलावर ठेवतील, असे म्हटले गेले आहे. सदस्यांना न्याय देणे, येथपर्यंत ठीक आहे. पण आपण सभागृहाची ऐसीतैसी करायला लागलो आहे. काय चाललंय काय? काय करतोय आपण? सगळ्यांना खुष करण्यासाठी परंपरा पायदळी तुडवत आहोत, असेही जयंत पाटील म्हणाले.
आठ दिवसांत घडलेल्या तातडीच्या घटनांच्या लक्षवेधी समजू शकतो. पण १० वर्षांपूर्वीच्या लक्षवेधी तातडीच्या होऊ शकत नाही. १०५ च्या नियमांमध्ये हे सर्व आहे. आमचे २९३चे चार प्रस्ताव क्लब केले तरी आम्ही काही बोललो नाही. दररोज लक्षवेधीवर चार-चार तास घालवत असू, तर सभागृहात बोलण्यात फार काही अर्थ राहात नाही, अशी खंतही पाटील यांनी व्यक्त केली.
Vijay Wadettiwar : वाढत्या गुन्हेगारीवरून वडेट्टीवार, जयंत पाटील सरकारवर तुटून पडले!
दुपारी दोन वाजेपर्यंत लक्षवेधी घ्या, असे विधानसभा अध्यक्ष सांगून गेल्याचे तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी सांगितले. त्यानंतर भास्कर जाधवसुद्धा उभे झाले. यावे्ळी सभागृहात गदारोळ झाला. गदारोळातच जाधव म्हणाले, लक्षवेधी ठराविक सदस्यांच्या आहेत. पण डिमांड संपूर्ण राज्याच्या आहेत. आम्ही सदस्यांच्या विरोधात नाही. मुख्य कामकाजाला वेळ दिला जात नाही, ही आमची खंत आहे. पहिल्या मंडळाचा प्रस्ताव अजून झाला नाही, असेही ते म्हणाले.