Congress started preparations for municipal council elections : जिल्हाध्यक्षांनी दिल्यात पदाधिकाऱ्यांनी सूचना
Amravati : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी केले.
परतवाडा येथे तालुका ग्रामीण व शहर काँग्रेस कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बोलताना बबलू देशमुख म्हणाले, “विधानसभा निवडणुकीतील अपयश विसरून कार्यकर्त्यांनी आता पूर्ण ताकदीने निवडणुकांच्या तयारीसाठी सज्ज व्हावे.” तसेच, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले असताना अल्पावधीतच विधानसभेत महायुतीला मोठे यश मिळणे संशयास्पद असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
Kirit Somaiya : अकोल्यात मोठा घोटाळा; बांग्लादेशी-रोहिंग्यांना असे दिले नागरिकत्व !
या बैठकीस अचलपूर बाजार समितीचे उपसभापती अमोल चिमोटे, रविभाऊ पाटील, महेरूल्ला भाई, राजाभाऊ टवलारकर, जयदेव गायकवाड, दीपकसेठ अग्रवाल, विनायक चौधरी, बाळासाहेब उभाड, श्रीकांत अपाले, देवेंद्र पेटकर, इतेशामभाई नबील, विश्वास गवई, नाकड साहेब, कैलाश आवारे, अमोल बोरेकार, सुधीर रहाटे, नामदेव तनपुरे, श्रीकांत झोडपे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अमरावती जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला यश मिळाले असतानाही विधानसभेत मात्र अपयशाचा सामना करावा लागला. या पार्श्वभूमीवर बैठकीत चर्चा करून नेमके कुठे चुकले, यावर मंथन करण्यात आले. झालेल्या चुका टाळून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी काम करण्याचे कार्यकर्त्यांना जिल्हाध्यक्षांनी आवाहन केले.
भाजपची तयारी अर्ध्यावर..
काँग्रेसने आता कंबर कसलेली असली तरीही भाजपने विधानसभा निवडणूक आटोपताच काम सुरू केले. त्यामुळे काँग्रेसला उशीर झाला आहे, असे म्हटले जात आहे. मुळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एप्रिल-मेमध्ये होतील, या उद्देशाने भाजप तयारीला लागले होते. पण तसे काही झाले नाही. आता दिवाळीपूर्वी निवडणुका होण्याची काही चिन्हे नाहीत. त्यामुळे काँग्रेस बॅकफुटवर गेले होते. आता हळूहळू तयारीला लागले आहेत. पण तोपर्यंत भाजपची तयारी अर्ध्यावर येऊन पोहोचली आहे.