Mahavitaran employees carried out repairs in heavy rain : जलमग्न झरंडी गावातील वीज खांब आणि डिपी वाहून गेली
Akola वीज आणि पाण्याचा छत्तीसचा आकडा असला तरी, अतिशय धोकादायक परिस्थितीत महावितरणच्या पिंजर येथील कर्मचाऱ्यांनी भर पावसात गावठाण वाहिनीची दुरुस्ती करून वीज पुरवठा सुरळीत केला. या जिगरबाज कर्मचाऱ्यांच्या धाडसाचे आणि तत्परतेचे गावकरी तसेच माध्यम प्रतिनिधींनी कौतुक केले आहे.
काल पिंजर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे गावठाण वाहिनी नादुरुस्त झाली आणि वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे सुमारे दोन हजार ग्राहक अंधारात गेले होते. मात्र, महावितरणचे कर्मचारी वैभव करपे, धीरजकुमार राऊत आणि आठवले यांनी जीवाची पर्वा न करता, चालू पावसात अत्यंत सुरक्षितपणे दुरुस्तीचे काम हाती घेतले. अथक प्रयत्नांनंतर त्यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश मिळवले.
पातूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे विश्वमित्रा नदीचे पाणी झरंडी गावात शिरले. त्यामुळे संपूर्ण गाव जलमग्न झाले असून, गावाचा संपर्क तुटला आहे. किमान १२ तासांनंतर पाणी ओसरल्यावरच संपर्क साधता येणार आहे. दरम्यान, नदीच्या प्रचंड दाबामुळे गावातील वीज पुरवठा करणारी डिपी आणि शेजारील शेतांतील वीज खांब पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. त्यामुळे झरंडीचा संपूर्ण वीजपुरवठा खंडित झाला आहे.
Ashish shelar : आशिष शेलारं यांनी काढली संजय राऊत यांची ‘औकात’
गाव व परिसर जलमग्न झाल्यामुळे डिपी आणि खांब वाहून जाण्याची शक्यता लक्षात घेता, महावितरणकडून तातडीने दुरुस्तीची तयारी करण्यात आली आहे. यासंदर्भात कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे यांनी माहिती दिली.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महावितरण सज्ज असून, मुख्य अभियंता राजेश नाईक व अधीक्षक अभियंता प्रतिक्षा शंभरकर हे संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्यास नागरिकांनी संयम बाळगावा व सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.