Breaking

Mahayuti Government : नागपुरातील मिनी मंत्रालयाची अग्निसुरक्षाच धोक्यात!

 

F safety of Mini Mantralaya in Nagpur is in danger : जिल्हा परिषदेची सुरक्षा धोक्यात

Nagpur जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषद मुख्यालयातील अग्निशामक यंत्रांची मुदत संपून जवळपास आठवडा झाला, मात्र याकडे प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष आहे. परिणामी जिल्हा परिषदेची सुरक्षा धोक्यात आली आहे.

सध्या तापमानात वाढ होत आहे. यातच शाॅर्टसर्किटमुळे आग लागण्याची शक्यता असते. आग लागल्याच्या अनेक घटना समोर येत असताना, जिल्हा परिषद प्रशासन आगीसारख्या घटनांपासून सुरक्षिततेच्या उपाययोजनांपासून अनभिज्ञ आहे. विशेष म्हणजे, अधिकारी या अग्निशामक यंत्रांकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाहीत.

जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात बसवण्यात आलेली अग्निशामक यंत्रांची मुदत संपली आहे. त्यामुळे अग्निशामक यंत्रे शोभेची वस्तू म्हणून राहिले आहेत.
मुख्यालयातील नवीन इमारतीमधील सीईओंच्या कक्ष असलेल्या माळ्यासह जवळपास सर्वच ठिकाणच्या अग्निशमन यंत्रांची मुदत संपल्यानंतरही रिफिलिंग करण्यात आलेले नाही.

Mahayuti Government : रोहयो मजुरांचे १८ कोटी थकीत!

अशा परिस्थितीत येथे अनुचित घटना घडल्यास याला जवाबदार कोण? हा सवाल उपस्थित होत आहे. जि.प.मध्ये येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह दररोज ग्रामीण भागातून आपल्या समस्या तक्रारी घेऊन येणाऱ्या नागरिकांची वर्दळ असते. अशा परिस्थितीमध्ये आगीसारखी कुठलीही अनुचित घटना घडल्यावर त्यावर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशामक उपकरण उपयोगी ठरतात. परंतु, हेच उपकरण कालबाह्य झाले आहेत.

Mahayuti Government : ‘लव्ह जिहाद’विरोधात कायदा होणार तरी कधी ?

त्यामुळे अग्निशमन यंत्रणा शासकीय कार्यालयांमध्ये केवळ औपचारिकता न राहता संबंधित कार्यालयातील यंत्रणा हाताळणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्याला वापरासंबंधी पूर्ण माहिती .
अग्निशमन यंत्रांमधील पावडरची मुदत एक वर्ष असते. वर्ष पूर्ण होण्याआधी त्यातील पावडर संबंधित कार्यालयाने बदलण्याची कार्यवाही करावी. संबंधित कंपनीला निर्देश देणे गरजेचे असताना तेही करण्यात जिल्हा परिषद प्रशासनाला मुहूर्त मिळाला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.