Breaking

Manikrao Kokate : रमी खेळतानाच्या ‘त्या’ व्हिडिओ मुळे विरोधकांची कृषिमंत्र्यांवर चौफेर टीका !

Rummy game on mobile in Assembly hall, video goes viral : विधानसभा सभागृहात मोबाईलवर रमीचा खेळ, व्हिडिओ व्हायरल

Mumbai : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांचा विधानसभा सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल होताच विरोधक त्यांच्यावर तुटून पडले असून त्यांच्यावर चौफेर टीका होताना दिसत आहे. आमदार रोहित पवार यांनी समाज माध्यमावर हा व्हिडिओ शेअर करताच विरोधकांनी कोकाटेंसोबत सरकारलाही घेरले असून त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांनी नुकतेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्र येण्यासंदर्भात भाजपला विचारल्या शिवाय काहीच करता येत नाही. अशा स्वरूपाचे वक्तव्य केले होते हा धागा पकडत आमदार रोहित पवार यांनी म्हणले आहे की,
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत, राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करत असताना भाजप निर्णय घेत असल्यामुळे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना काही काम शिल्लक राहिलेलं नाही. त्यामुळेच कृषी मंत्री कोकाटे यांना सभागृहात बसून रम्मी खेळण्याची वेळ आली असावी. रोहित पवार यांनी कृषिमंत्री यांचा व्हिडिओ पोस्ट करताना ‘ जंगली रम्मी पे आओ ना महाराज’ म्हणत कृषीमंत्र्यांची खिल्ली उडवली आहे.

Sanjay Raut : राज्यातील काही मंत्र्यांना वगळण्याचा अमित शहांचा सल्ला !

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या सर्व प्रकारावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. आव्हाड यांनी समाज माध्यमावर एक पोस्ट करत कोकाटे यांना चांगलाच चिमटा काढला आहे. ‘शेतकऱ्यांनो विसरा हमी, खेळा रम्मी’, टोला लगावला आहे. लोकशाहीच्या पवित्र मंदिरात सत्ताधारी आमदार काय काय करतात हे समोर येत असल्याची टीका त्यांनी केली. शेतकऱ्यां विषयी उलटसूलट वक्तव्य करायचे. दुसरीकडे जंगली रमीमुळे अनेक आत्महत्या झाल्या आहेत. तोच खेळ मंत्री सभागृहात खेळत असल्यावर त्यांनी टीका केली.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकारावर जोरदार टीका केली. हे जनतेच्या बोकांडी बसलेल नतभ्रष्ट सरकार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात असं सरकार पुन्हा होणार नाही. कोणाचीच परवा नसलेल हे सरकार आहे. शेतकरी कर्जाखाली दबलेला आहे. आठ ते दहा शेतकरी रोज आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्यांचे पीक विम्याचे एक तृतीयांश पैसे सरकार भरत होते. आता पूर्णतः पिक विमा शेतकऱ्याला भरायचा आहे. मत घ्यासाठी एक रुपयात विमा आणि आता मात्र तुमचं तुम्ही बघा अशी भूमिका सरकार घेत आहेय, अशी टीका त्यांनी केली.

Uddhav Thackeray : भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवा, समाजातील भेदाभेद नष्ट कर !

भाजपवाल्यानी कोकाटे यांना केवळ नावालाच मंत्री केलाय. त्यामुळे यांना काम उरलेले नाही, म्हणून ते रमी खेळत आहे. किंवा अधिकार नसल्यामुळे यांना काही करायची इच्छा नसेल कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा अशी अवस्था झाली आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. चड्डी बनियान लुंगी बनियान वाले मंत्री, गुंडांना सोबत घेणारे आमदार, काय चाललंय महाराष्ट्रात? या धोकेबाज सरकारला धडा शिकवा, आणि वादग्रस्त वक्तव्य करणारे कृषिमंत्री यांना त्या पदावर ठेवायचं की नाही याचा निर्णय मुख्यमंत्री यांनी घ्यावा. मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांबद्दल कणव असेल तर अशा मंत्र्यांना ते त्या पदावर ठेवावं का हा विचार मुख्यमंत्री करतील, असे वडेट्टीवार म्हणाले.