Will call a statewide strike if demands are not fulfilled : मागण्या मान्य झाल्या नाही तर बंद पुकारणार
Amravati “बच्चूभाऊ, तुम्ही एकटे नाही, आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुमच्या मागण्या मान्य न झाल्यास हे सरकार कितीही मोठं असलं तरी सळो की पळो करून सोडू,” असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना उद्देशून दिला.
“मी शेतकऱ्याचा पोरगा म्हणून येथे आलो आहे,” असे स्पष्ट करत राज्यातील तमाम शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन बच्चू कडू यांच्या आंदोलनासाठी राज्य बंदचे आवाहन करावे, असे मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी गुरुकुंज मोझरी येथे स्पष्ट केले.
Bacchu Kadu : बच्चू कडू म्हणाले, ‘बावनकुळेंकडून दमदाटीची भाषा’!
माजी मंत्री बच्चू कडू हे मागील चार दिवसांपासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरुकुंज मोझरी येथे शेतकरी प्रश्नांवर उपोषण करत आहेत. बुधवारी दुपारी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देत त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी जरांगे पाटील म्हणाले, “सरकारला सळो की पळो करून सोडले पाहिजे. सर्व शेतकरी संघटनांनी एकत्र येत आंदोलनाचे रणशिंग फुंकावे. जर न्याय मिळत नसेल, तर रस्त्यावर उतरावंच लागेल.”
Raj Thackeray Meets Devendra Fadnavis : राज-फडणवीसांच्या भेटीने ‘मनोमिलन’ धोक्यात!
ते पुढे म्हणाले, “बच्चूभाऊंची तब्येत दिवसेंदिवस खालावत आहे. त्यामुळे या लढ्याला उशीर न करता तात्काळ समर्थन देणे आवश्यक आहे.” या भेटीवेळी आंतरवाली सराटी व बद्री कारथ येथील शेतकरी प्रतिनिधी, आप्पासाहेब कुपेकर, मराठा आंदोलक अमर काळे, नानासाहेब पवार, संजय गोडसे आदी उपस्थित होते.
Bacchu Kadu Strike : शरद पवारांचा फोन, मनोज जरांगेची भेट, अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस
या आंदोलनाला विविध स्तरांतून पाठिंबा मिळत असून, माजी मंत्री महादेव जानकर व शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनीही बच्चू कडू यांची भेट घेत पाठिंबा जाहीर केला. दरम्यान, भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलनावर प्रतिक्रिया देताना म्हटले, “कडू यांनी असे आंदोलन करण्यापेक्षा लोकाभिमुख कामावर भर द्यावा.”