Vehicle damaged in riots, yet the compensation not received : सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या मारून त्रस्त; प्रशासन सुस्त
Nagpur नागपूरमधील महाल परिसरात तीन महिन्यांपूर्वी दंगल झाली. या दंगलीची चर्चा संपूर्ण देशभरात झाली. धार्मिक वादातून हे घडल्यामुळे त्यावर राजकारणही झाले. गेल्या तीन महिन्यांपासून सारंकाही शांत आहे. पण, दंगलीत ज्यांच्या वाहनांचे नुकसान झाले ते लोक भरपाईसाठी अजूनही सरकारी कार्यालयाच्या फेऱ्याच मारत आहेत. प्रशासनाच्या सुस्त कारभारामुळे दंगलग्रस्तांना त्रास सहन करावा लागत आहे.
चिटणवीस पार्कजवळ राहणारे मधुसूदन सिंघानिया यांनी याबाबत आरोप लावला आहे. सिंघानिया म्हणाले, १७ मार्च रोजी महाल परिसरात अचानक दंगल उसळली. यादरम्यान, दुरुगकर चाळ परिसरात पार्क केलेली एक कार दंगलखोरांनी पेटवून दिली. बाइक क्रमांक सीजी १० – बीके ३६२४ देखील या कारजवळ पार्क केलेली होती. दंगलखोरांनी या बाइकची तोडफोड केली आणि गाडीचा आरसा आणि हेल्मेटही सोबत घेऊन गेले.
Nagpur Municipal corporation election : मनपा निवडणुकीत भाजप पाळणार नाही ‘महायुतीचा धर्म’?
घटनेनंतर पोलिसांनी जबाब नोंदवून पंचनामा केला. पण, पंचनाम्याची प्रत मिळविण्यासाठी अनेक दिवस गणेशपेठ पोलिसांकडे जावे लागले. फाइल क्लीअर करण्यासाठी महिनाभर एसडीएम कार्यालयात चकरा मारल्या. काम न झाल्याने अखेर एका वरिष्ठ अधिकाऱ्याला भेटून विनवणी केली. त्यानंतर फाइल क्लीअर करण्यात आली.
Zilla Parishad Nagpur : पती-पत्नी एकत्रीकरणात प्रशासनाचा खोडा, शिक्षकांना मनःस्ताप
२८ एप्रिल रोजी जिल्हा प्रशासनाने हर्ष बुल्स प्रायव्हेट लिमिटेड, बिलासपूरच्या नावाने १० हजार रुपये भरपाई म्हणून मंजूर केले. त्यांच्याप्रमाणेच, विलास शंकर यांच्या घराच्या नुकसानीसाठी ३५ हजार रुपये, अक्षय श्रीवास यांच्या दुकानाच्या नुकसानासाठी २० हजार आणि संकेत मंगरूळकर यांच्या गाडीच्या नुकसानीसाठी ४० हजार रुपये मंजूर करण्यात आले. परंतु, गेल्या एक महिन्यापासून सिंघानिया भरपाई मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात फेऱ्या मारत आहेत. या दंगलीतील अनेक पीडितांनाही नुकसानभरपाई मिळालेली नाही. ते न्यायाची वाट पाहत आहेत.