Narendra modi : मोठं वक्तव्य ; “राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो”

pm-narendra-modi-rajya-sabha-speech-no-full-stop-in-politics-retiring-mps-2026 : राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निवृत्त खासदारांना संदेश

Mumbai: राज्यसभेत निवृत्त होणाऱ्या खासदारांच्या निरोप समारंभाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी महत्त्वपूर्ण भाषण करत “राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो” असे मोठे वक्तव्य केले. यावेळी त्यांनी निवृत्त होणाऱ्या सर्व खासदारांच्या कार्याचे आणि योगदानाचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

भाषणादरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले की, संसदेत विविध महत्त्वाच्या विषयांवर सातत्याने चर्चा होत असते आणि प्रत्येक सदस्य आपली भूमिका बजावत असतो. या प्रवासात चांगले-वाईट अनुभव येत असले तरी निरोपाच्या क्षणी पक्षीय मतभेदांच्या पलीकडे जाऊन एकमेकांबद्दल आदराची भावना निर्माण होते. काही सदस्य कायमचे निरोप घेत असतात, तर काही पुन्हा सभागृहात येण्यासाठी निघत असतात, असे त्यांनी नमूद केले.

Sudhir mungantiwar : मुनगंटीवारांमुळे मजूर-महिला सहकारी संस्थांना मिळणार ‘रिअल स्ट्रेंथ’*

पुढे बोलताना मोदी म्हणाले की, सभागृहातून बाहेर पडणारे सदस्य आपला मौल्यवान अनुभव घेऊन पुढील आयुष्यात नवे योगदान देण्यासाठी सज्ज होत असतात. “राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो, भविष्य नेहमी तुमची वाट पाहत असते. तुमचा अनुभव आणि तुमचे कार्य राष्ट्रासाठी कायम उपयोगी पडले पाहिजे,” असा संदेश त्यांनी दिला.

या भाषणात पंतप्रधानांनी ज्येष्ठ नेत्यांचेही विशेष कौतुक केले. शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे आणि एच. डी. देवेगौडा यांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, या नेत्यांनी आपल्या आयुष्यातील मोठा काळ संसदीय कामात घालवला असून त्यांचा अनुभव नवीन खासदारांसाठी प्रेरणादायी आहे.

यावेळी हरिवंश सिंह यांच्या कार्यशैलीचेही मोदींनी कौतुक केले. सभागृहाचे कामकाज शांत, संयमी आणि प्रभावीपणे हाताळल्याबद्दल त्यांनी हरिवंश सिंह यांचे अभिनंदन केले. तसेच रामदास आठवले यांच्या विनोदी शैलीचा उल्लेख करत, ते निवृत्त होत असले तरी त्यांच्या उपस्थितीची उणीव भासणार नाही, असे हलक्याफुलक्या शब्दांत त्यांनी म्हटले.

Zp election : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत नवा राजकीय ट्विस्ट, ठाकरे गट तटस्थ !

या भाषणामुळे राज्यसभेतील वातावरण भावनिक आणि प्रेरणादायी झाले असून पंतप्रधानांच्या “राजकारणात फुलस्टॉप नसतो” या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.