Pakistan will no longer feed terrorism after Indian airstrikes : यापुढे पाकिस्तानची यापेक्षाही वाईट स्थिती करणार
Mumbai : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हल्ला करून पर्यटकांना ठार केले. त्या दिवसापासून भारताने बदला घेण्याचे ठरवले होते. काल मध्यरात्रीनंतर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला. निशस्त्र पर्यटकांना गोळ्या घालणाऱ्यांना त्यांच्याच जमिनीवर जाऊन धडा शिकवला आहे. भारत कुणासमोरही झुकणार नाही, हे सरकारने ऑपरेशन सिंदूर राबवून दाखवून दिले, असे विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.
घरात घुसून मारू, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम हल्ल्यानंतर सांगितले होते. त्यांनी देशवासीयांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तान आता तरी दहशतवाद पोसणार नाही, अशी आशा करायला हरकत नाही. अन्यथा पाकिस्थानची यापेक्षाही वाईट परिस्थिती होईल, असा संदेशच भारताने या हल्ल्यातून दिला आहे, असे दरेकर म्हणाले.
Bacchu Kadu : राज्यात तीन माकडांचे सरकार; आता रस्त्यावर उतरण्याची वेळ
भारताने काल मध्यरात्रीनंतर ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ९ ठिकाणांवर हल्ले केले. पाहता पाहता दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त झाले. या कारवाईसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ शिंग, तिन्ही सैनादलांचे प्रमुख यांचे दरेकर यांनी अभिनंदन केले. या प्रसंगात सर्व भारतीय एक राहिले, हीच आपली ताकत असल्याचेही ते म्हणाले.
Cataract surgery : समाजकारणातून मिळवले नागरिकांच्या मनात स्थान !
पाकिस्तानला जशास तसे प्रत्युत्तर दिल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारचे अभिनंदन केले आहे. ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानला योग्य धडा शिकवला, असेही शिंदे म्हणाले.