Breaking

Rahul Gandhi : महाराष्ट्र विधानसभेत ‘मॅच फिक्सिंग’ सारखी हेराफेरी : राहुल गांधी

 

Match-fixing like rigging in Maharashtra
सातत्याने होणाऱ्या आरोपांमुळे ‘संशय कल्लोळ’ थांबेना

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गंभीर आरोप केले आहेत. विधानसभेत ‘मॅच फिक्सिंग’ सारखी हेराफेरी झाली आणि ही निवडणुकच चोरीला गेल्याचा दावा त्यांनी केला आहे. निवडणुकीतील हेराफेरीचे पाच टप्पे त्यांनी सांगितले आहेत. मुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि भाजप प्रवक्ते, राहुल गांधींच्या कोणत्याही आरोपाला गांभीर्याने न घेता, आपली बाजू मांडत आहेत, मात्र वारंवार होणाऱ्या अशा आरोपांमुळे ‘संशय कल्लोळ’ मात्र थांबण्याचे नाव घेत नाही. हेच पाहायला मिळत आहे.

राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर गंभीर आरोप केले. यात निवडणूक आयोगाच्या नियुक्तीत फेरफार, बनावट मतदार जोडणे, मतदारांची संख्या वाढवणे, बोगस मतदान करणे आणि पुरावे लपवणे या पाच गोष्टींचा समावेश असल्याचा दावा केला आहे. ही हेराफेरी भाजपने केली. फसवणूक करणारा पक्ष जिंकू शकतो. पण यामुळे संस्थांचे नुकसान होते. लोकांचा निकालावरील विश्वास उडतो, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे,

Dcm eknath shinde : किडनी विकाराने ग्रस्त लाडक्या बहिणीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मदत

सर्व संबंधित भारतीयांनी पुरावे पाहिले पाहिजेत. स्वतःच न्याय करा, उत्तरे मागा. कारण महाराष्ट्रातील मॅच फिक्सिंग पुढे बिहारमध्ये येईल आणि नंतर जिथे भाजप हरत असेल तेथे फिक्सिंग होईल. अशा निवडणुका कोणत्याही लोकशाहीसाठी विष आहेत, असेही राहुल गांधींनी एका लेखाच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे. त्यावरून पुन्हा चर्चा झडू लागल्या आहेत.

राहुल गांधींनी समाज माध्यमा वरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, निवडणूक कशी चोरायची? 2024 मधील महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही लोकशाहीच्या धांदलीची ब्लू प्रिंट होती. माझा लेख दाखवतो की ते कसे घडले? त्यांनी यापूर्वी निवडणूक आयोगावर आरोप केले होते बोस्टन येथे एका कार्यक्रमात म्हणले होते की, ‘निवडणूक आयोग आता निःपक्षपाती राहिलेला नाही, तडजोड झाली आहे.’ दोन तासात लाखो मते पडणे अशक्य आहे. हे सांगताना त्यांनी आकडेवारीही दिली होती.

Local body elections in multiple phases: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक होणार वेगवेगळ्या टप्प्यांत

राहुल गांधी यांच्या आरोपाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले. आणि त्यांचे आरोप खोडून काढले. स्वतःचे अपयश लपवण्यासाठी दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा आत्मपरिक्षण करा, असा सल्लाही दिला. मुख्यमंत्री राहुल गांधींच्या आरोपांना गांभीर्याने न घेता उडवून लावतात. तर भाजपचे इतर प्रवक्ते लोकसभेनंतर विधानसभेसाठी मतदार संख्या वाढली, उशिरापर्यंत मतदान चालले. एवढेच फिरवून फिरवून सांगतात. आणि काँग्रेस वर इतर आरोप करत विषय दुसरीकडे नेतात.

Voters Number : तुमच्यात दम असेल तर खरंच खुलासा करा, वडेट्टीवारांचे बावनकुळेंना आव्हान !

 

विरोधक जेव्हा खोलात जाऊन प्रश्न विचारतात तेव्हा मात्र ते तुम्ही तक्रार करा, इलेक्शन कमिशन कडे जा, असे उत्तर देऊन टाळतात. राहुल गांधी असो वा राज्यातील नेते यांनी याप्रसंदर्भात उपस्थित केलेल्या कोणत्याही प्रश्नाचे संयुक्तिक उत्तर पटवून देण्यास महाविकास आघाडी विशेषता भाजप असमर्थ ठरल्यामुळे संशय वाढतच आहे. हा झाला राजकारणाचा भाग. पण सामान्य जनतेलाही निवडणूक प्रक्रियेबद्दल असाच संशय आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यापासून काहीतरी गडबड आहे अशीच भावना सर्वसामान्य जनतेत निर्माण झालेली आहे त्यामुळे या हेराफेरीचा ‘संशय कल्लोळ’ थांबायचे नाव घेत नाही.

#Rahul Gandhi #Election Commission #Match fixing #Maharashtra election #Congress leader Rahul Gandhi #Congress #Revenue Minister #bjp #BJP spokesperson #राहुल गांधी #निवडणूक आयोग #मॅच फिक्सिंग #महाराष्ट्र निवडणूक #काँग्रेस नेते राहुल गांधी #काँग्रेस #महसूल मंत्री #भजप #भाजप प्रवक्ते

  • सचिन काटे (विशेष प्रतिनिधी)

    २७ वर्षांपासून विविध राज्यस्तरीय दैनिकांमध्ये रिपोर्टरपासून कार्यकारी संपादक पर्यंतचा विस्तृत अनुभव. डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात ही यशस्वी योगदान.