Breaking

Sandeep Deshpande : सरकारमध्ये षंढ लोक बसले असतील तर करायचं काय?

MNS leader Sandeep Deshpande’s statement creates a stir : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या वक्तव्यामुळे खळबळ

Mumbai : सर्व मराठी माणसांना आमचं आवाहन आहे, तुम्ही जर मराठी असाल तर रस्त्यावर उतरा. सरकारमध्ये सर्व षंढ लोक बसले असतील तर मराठी माणसाने करायचं काय? मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की सरकारला अजूनही हिंदीबद्दल का प्रेम आहे हे कळत नाही. असे वक्तव्य मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केले त्यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ माजली आहे.

मराठी माणसांनी तुम्हाला निवडून दिलंय हे तुम्ही विसरून नये. ज्यांनी निवडून दिले तो तुम्हाला घरी पण बसवू शकतो हे लक्षात घ्यावे, असेही देशपांडे यांनी म्हटले. सरकारमधील लोकनेत्यांवर देशपांडे यांनी केलेल्या टीकेचे विरोधात मंत्री प्रताप सरनाईक तसेच नीलम गोरे यांनी टीका केली आहे. सरकारने शालेय शिक्षण धोरणात बदल करत पहिलीपासून तिसरी भाषा सक्तीची केली असून बहुपर्यायी भाषेचा पर्याय विद्यार्थी व पालकांना दिला आहे. मात्र, बहुपर्यायीच्या माध्यमातून हिंदी सक्ती लादण्याचा शासना प्रयत्न असल्याचे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं शासनाच्या या निर्णयाला विरोध केला आहे. पहिलीपासून हिंदी सक्ती किंवा तिसरी भाषा नको म्हणत मनसेनं अनेक आंदोलनं सुरू केली आहेत.

Dr. Rajendra Shingne : सत्ताधाऱ्यांच्या प्रलोभनांना जनता कंटाळली, शिंगणे यांचा दावा

आम्ही सगळे सन्मानाने आंदोलन करत आहोत, सरकारने तोपर्यंत दखल घ्यावी. उद्या महाराष्ट्रभर थैमान घालायला लावू नये, अन्यथा जबाबदारी सरकारची असेल, असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला आहे. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर सह्यांच्या मोहिमेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातल्या दोन भाषा शिकवल्या जातील, तिसऱ्या भाषेची सक्ती महाराष्ट्रात पहिलीपासून नको. सकारात्मक निर्णय बैठकीमध्ये त्यांनी घ्यावा, सध्या तसा सकारात्मक जोर भरपूर आहे. सरकारने सक्तीचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा उद्याच रस्त्यावर आम्ही तांडव मांडायला लागलो तर मराठी माणसाला आणि महाराष्ट्र सैनिकांना आवरणं सरकारला कठीण होईल, असं इशाराही दिला आहे.

Harshvardhan Sapkal : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ. आषाढी वारीच्या दिंडीत सहभागी होणार

लोकांची संभ्रमावस्था दूर करणं हे सरकारच कर्तव्य आहे, त्यांनी ते केलं पाहिजे. तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहणार आहे, असेही त्यांनी म्हटले. मराठीची गळचेपी होत आहे व हिंदीची सक्ती करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे आणि आमची भावना ही आहे की सर्व मराठी माणसांनी रस्त्यावर उतरुन या गोष्टीचा निषेध केला पाहिजे. फक्त 9 वाजता बोलबच्चनगिरी करुन काही होणार नाही, असे म्हणत संदीप देशपांडे यांनी नाव न घेता शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला.

Anand paranjpe : अबू आझमी ही महाराष्ट्राला लागलेली कीड; सरकारने कारवाई करावी: परांजपे

अबू आझमींना पडलेली कानाखाली विसरले असतील तर पुन्हा एकदा आम्हाला कानाखाली द्यावी लागेल. त्याशिवाय त्यांची अक्कल ठिकाणावर येणार नाही, असे म्हणत अबू आझमींच्या वारीसंदर्भातील वक्तव्यावरुन संदीप देशपांडे यांनी इशारा दिला आहे.