Even after six years, the water problem has not been resolved : आमसभेत पुन्हा एकदा गाजला मुद्दा; आमदारांची उपस्थिती
Buldhana तब्बल सहा वर्षांनंतर झालेल्या सिंदखेड राजा पंचायत समितीच्या आमसभेत पाणीपुरवठ्याचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला. विशेष म्हणजे सहा वर्षांपूर्वी देखील आमसभेत पाण्याचाच मुद्दा गाजला होता. एक साधी समस्या सहा वर्षांपासून सुटत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे आमदार मनोज कायंदे MLA Manoj Kayande यांची पहिलीच आमसभा वादळी ठरल्याने चांगलीच चर्चा होत आहे.
कायंदे यांच्या अध्यक्षतेत मातोश्री मंगल कार्यालयात ही सभा पार पडली. यावेळी महसूल, पालिका, पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभागांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सभेत विभागनिहाय आढावा घेण्यात आला. तसेच वेळेवर आलेल्या नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यात आल्या. यावेळी माजी नगराध्यक्ष ॲड. नाझेर काझी, देवीदास ठाकरे उपस्थित होते.
Wardha Administration : वाळूचे ट्रॅक्टर तर दिसले, मग अधिकाऱ्यांनी कारवाई का केली नाही?
सध्या तालुक्यात जलजीवन मिशन आणि राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत विविध प्रकल्प सुरू आहेत. ७० टक्के योजना पूर्णत्वास गेल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली. मात्र अद्याप अनेक गावांत योजना सुरू न झाल्याच्या आणि अडथळ्यांच्या तक्रारी ग्रामस्थांनी मांडल्या. पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी गिरीश मालोकर यांनी ग्रामस्थांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. तर आमदार कायंदे यांनी योजना वेळेत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाईचे निर्देश दिले.
Prataprao Jadhav, Ravikant Tupkar : सगळे म्हणतात आम्हीच सोडवला शेतकऱ्यांचा प्रश्न!
सभेत विविध प्रश्नांवर चर्चा झाली. यात महसूल विभागाने वाळू माफियांवर कारवाई करावी. पोलिसांनी अवैध धंद्यांना आळा घालावा. सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाने कामांचा दर्जा सुधारावा. मृद व जलसंधारण विभागाने पाण्याचे समान वाटप करावे. रोजगार हमी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर द्यावा, अश्या मागण्या करण्यात आल्या.