Breaking

Student passes : आता एसटीच्या पासेससाठी होणार नाही विद्यार्थ्यांची पायपीट !

Transport Minister and ST Corporation Chairman Pratap Sarnaik’s Instructions to the administration : शाळा – महाविद्यालयात जाऊन कर्मचारी देतील पासेस

Mumbai : एसटी महामंडळाद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या सवलतीच्या पासचे महत्व शहरांतील विद्यार्थ्यांना तेवढे नाही. पण ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांसाठी या पासेस खूप महत्वाच्या आहेत. ग्रामीण विद्यार्थ्यांना एका गावातून दुसऱ्या गावांत जाऊन शिक्षण घ्यावे लागते. त्यासाठी लालपरी महत्वाची भूमिका बजावते. पूर्वी या पासेससाठी पायपीट करावी लागत होती आणि तासनतास रांगेत उभे राहावे लागत होते. पण आता विद्यार्थ्यांची ही पायपीट थांबणार आहे.

शाळा – महाविद्यालयांत शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी – विद्यार्थीनींना आता एसटीचे पास त्यांच्या शाळेत उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या सुचना राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. उद्यापासून (ता. १६ जून) नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा सुरू होत आहेत. शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून ६६.६६ टक्के सवलत दिली आहे. फक्त ३३.३३ टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासीक पास मिळणार आहेत.

Thackeray Fadnavis meet : सध्या मदाऱ्यांचा खेळ सुरू, मराठी माणसांच्या भविष्यासंदर्भात एकतर्फी चर्चा !

शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत १२ वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थीनींना एसटीचे पास मोफत दिल्या जातात. यापूर्वी मुलींना एसटीच्या पास केंद्रांवर जाऊन तासनतास रांगेत उभे राहून पास मिळवावे लागत होते. गटागटाने जाऊन आगार व्यवस्थापकांकडूनही पासेस घेण्याची सुविधा होती. पण आता या विद्यार्थीनींनाही रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही. शाळा – महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीचे कर्मचारी शाळा – महाविद्यालयांत जाऊन पासेस देणार आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांचा मोलाचा वेळ वाचणार आहे.

Local Body Elections : युती-आघाडीशी हात मिळवणार नाही; बसपाची भूमिका

राज्यातील सर्व शाळा – महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थी – विद्यार्थीनींची यादी तयार करण्यास यापूर्वीच सांगितले आहे. ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ या योजनाचा फायदा राज्यभरातील विद्यार्थी – विद्यार्थीनींना होणार आहे.