Breaking

Vanchit bahujan aaghadi : आंबेडकर म्हणाले, एकत्र लढलो तरच फायदा

Agitation for the Mahabodhi Mahavihar : महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आंदोलन; शेकडो कार्यकर्त्यांचा सहभाग

Akola बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर बुधवारी सहभागी झाले. जिल्ह्यातील वंचितचे अनेक नेते व पदाधिकारीही यावेळी त्यांच्यासोबत होते. अॅड. आंबेडकर १७ एप्रिल रोजी पुन्हा आंदोलनात सहभागी होणार आहेत.

“बौद्ध व आंबेडकरवादी संघटनांनी आणि पक्षांनी एकत्रित लढा दिल्यासच महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्ध धर्मियांच्या हाती येऊ शकते,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

Harshawardhan Deshmukh : मोर्शीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शक्तीप्रदर्शन!

महाबोधी महाविहार : ऐतिहासिक पार्श्वभूमी

बोधगया हे जागतिक बौद्ध धर्मीयांचे सर्वात पवित्र स्थळ मानले जाते. याठिकाणीच भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती. परंतु १९४९ साली बिहार सरकारने महाबोधी मंदिर व्यवस्थापन कायदा लागू करून व्यवस्थापनात बौद्ध धर्मियांचे संपूर्ण नियंत्रण झपाट्याने कमी केले. आजही या पवित्र स्थळी धम्माचा प्रचार प्रभावीपणे होत नाही, अशी तक्रार आहे. त्यामुळे १९४९ चा कायदा रद्द करून संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध समाजाच्या हाती द्यावे, अशी मागणी केली जात आहे.

अकोल्यातून स्वाक्षरी अभियानाला मोठा प्रतिसाद

महाविहाराच्या मुक्तीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे अकोल्यात स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले. प्रथम टॉवर चौकातhttps://sattavedh.com/harshawardhan-deshmukhncps-power-show-of-strength-in-morshi/ झालेल्या अभियानात ६७९ नागरिकांनी स्वाक्षऱ्या केल्या. महिलांपासून विद्यार्थ्यांपर्यंत सर्व स्तरातून मोठा प्रतिसाद लाभला. त्यानंतर अशोक वाटिका येथे युवक आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या पुढाकाराने दुसरे टप्प्यातील अभियान राबवण्यात आले, ज्यात ११०० जणांनी सहभाग नोंदवला.

आंदोलनासाठी रेल्वे मागणी

बुद्धगया येथे आंदोलनात सहभागी होण्यासाठी अकोल्यातून विशेष रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी वंचितने रेल्वे स्थानक व्यवस्थापकांकडे केली आहे. अकोल्यातील वंचितच्या नेत्यांनी बैठक घेऊन आंदोलनात सहभागी होण्यासाठी नियोजन केले होते.

DCM Ajit Pawar : काय सांगता? अकोला विमानतळाचे उड्डाणही लवकरच!

अकोल्याचे नेतृत्व आंदोलनात सक्रिय

आंदोलनात जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महासचिव मिलिंद इंगळे, सुनील फाटकर, अशोक दारोकार, चरण इंगळे, किशोर जामणिक, दीपक सावंत, प्रदीप शिरसाठ, भगवान उमाळे, रवी मनसुबे, संजय किर्तक, प्रमोद इंगळे, राजू मुंधवाने, गोलू खिल्लारे, संतोष इंगळे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले.