Breaking

Water shortage : मुख्यमंत्र्यांसह तीन मंत्री, डझनावर आमदार; तरी नळाला नाही धार!

Severe water problem in 316 villages of Nagpur district : नागपूर जिल्ह्यतील ३१६ गावांमध्ये पाण्याची भीषण समस्या; विरोधक एसी केबीनमध्ये खुश

Nagpur उन्हाच्या पाऱ्याने चाळीशी केव्हाच ओलांडली. उन्हाच्या झळा जसजशा वाढू लागल्या तसतशी पाण्याची टंचाईही वाढू लागली. टॅंकर दृष्टीपथास पडू लागले आहेत. आजघडीला नागपूर जिल्ह्यातील ३१६ गावांमध्ये पाण्याची भीषण समस्या जाणवू लागली आहे. पण अद्यापही उपाययोजना सुरू झाल्या नाहीत. फक्त कागदी घोडे मात्र नाचवले जात आहेत. मुख्यमंत्र्यांसह तीन मंत्री, डझनाच्या वर आमदार नागपूर जिल्ह्यात आहेत. पण तरीही ‘हाय प्रोफाईल’ जिल्ह्यावर दुर्दैवाने टंचाईचे सावट आहे. या परिस्थितीत विरोधक मात्र एसी केबीनमध्ये खुश असल्याचे दिसून येत आहे.

नागपूर हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जिल्हा आहे. या जिल्ह्याला त्यांच्यासह तीन-तीन मंत्री, दोन खासदार, डझनावर आमदार लाभले आहेत. पण तरीही पाच-दहा नव्हे तर तब्बल ३१६ गावांमध्ये पाण्याची भीषण समस्या जाणवते आहे. तर मग हे सर्व नेते करत काय आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ग्रामीण सारखी शहराचीही स्थिती आहे. शहराच्या काही भागांतही टॅंकर दिसू लागले आहेत. पण उपाययोजना मात्र शून्यच.

Maharashtra Jeevan Pradhikaran : शिवसेना जिल्हाप्रमुखाचे जलवाहिनीवर अवैध कनेक्शन!

प्रशासनाचे कागदी घोडे नाचवणे सुरू झाले आहे. हा खेळ काही दिवस चालणार. तुरळक ठिकाणी उपाय केलेले दिसतीलही. मग ‘नेमेची येतो पावसाळा..’ या उक्तीप्रमाणे जून, जुलैमध्ये पाऊस येतोच आणि विषय संपला. प्रशासनाचा हा दरवर्षीचा नित्यक्रमच झाला आहे. दरवर्षी एप्रिलमध्ये पाणी टंचाईची समस्या उद्भवते. त्यासाठी जानेवारीपासूनच उपाय सुरू केले पाहिजे. हे सामान्य माणसाला कळते, तर मग प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांना आणि पुढाऱ्यांना कळू नये, याचे आश्चर्य वाटते.

पाणी टंचाईने होरपळत असलेल्या लोकांना पाणी देण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाची आहे. पण या विभागाने आपले काम वेळेत केले नसल्याचे दिसत आहे. उपविभागीय कार्यालयांतून कृती आराखडे उशिरा मिळाल्याचे कारण दिले जात आहे. त्यामुळे एकत्रित कृती आराखडा जिल्हाधिकाऱ्यांकडे उशिरा पोहोचला. जिल्हाधिकाऱ्यांनी आराखड्याला मंजुरी दिली. तरीही उपाययोजनांना उशीर का होतो आहे, हे सांगायला कुणी तयार नाही.

निसर्ग किती दिवस धाऊन येणार?
उन्हाने अंगाची लाही लाही होत असताना गेल्या आठवड्यात निसर्गाने साथ दिली. तीन दिवस पावसाने हजेरी लावली. पहिल्या दिवशी ढगाळ वातावरणात हलक्या सरी बरसल्या. त्यानंतर दोन दिवस जोरदार पाऊस झाला. त्यामुळे वातावरण थंडं झाले. चाळीशी पार गेलेला पारा २५ अशांपर्यंत घसरला. थोडा दिलासा मिळाला. त्यानंतर मात्र सूर्य पुन्हा आग ओकू लागला. सद्यस्थितील पारा ४२ अंशाच्या वर गेला आहे. हवामान खात्याने उष्णतेच्या लाटांचा इशारा दिला आहे. तापमानात आता वाढच होणार आहे. त्यामुळे पाणी टंचाईची कामे लवकरात लवकर करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांसह तीन मंत्री, डझनावर आमदार, दोन खासदार असतानाही जनता पाण्यासारख्या मुलभूत समस्येशी झगडत आहे. हेच का गतीमान सरकार ?

Amravati Airport : ‘टेक ऑफ’ ठरले! अमरावती विमानतळ 16 एप्रिलपासून सेवेत

विरोधकांना पाण्यात ‘अर्थ’ दिसत नाही
सत्ताऱ्यांवर वचक ठेवण्याचे काम विरोधकांचे असते. महायुती सरकारमध्ये विरोधकांची संख्या तुटपुंजी आहे. तरीही विरोधी पक्षनेता असावा. यासाठी नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक सभागृहात भांडताना दिसले. जनतेला मुबलक पाणी मिळावे, ही जबाबदारी जशी सत्ताधाऱ्यांची आहे, तशीच ती विरोधकांचीही आहे. त्यांनाही जनतेने निवडून दिले आहे. पण विरोधक फक्त ‘अर्थ’ असलेल्या विषयांसाठीच भांडताना दिसतात. मुळ प्रश्नांकडे त्यांचेही लक्ष नाही, हे आपले दुर्दैव आहे.

  • अतुल मेहेरे (विशेष प्रतिनिधी)

    अमरावती विद्यापीठातून पत्रकारीतेची पदवी. २६ वर्षांपासून पत्रकारीतेमध्ये कार्यरत. सन २००० पासून लोकमत आणि सकाळ वृत्तपत्र समुहामध्ये विविध पदांवर कार्य केलेले आहे. दैनिक सकाळच्या सरकारनामा या वेब पोर्टलसाठी राजकीय प्रतिनिधी म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.