Zilla Parishad election : अमरावतीत जिल्हा परिषदेसाठी काँग्रेसचा ‘प्लॅन रेडी’; स्थानिक स्वराज्य संस्था काबीज करण्यासाठी मोठी मोर्चेबांधणी

amravati-congress-zilla-parishad-election-booth-level-strategy : जिल्हा परिषद–पंचायत समितीसाठी ग्रामीण भागात ताकद वाढवणार; भाजपविरुद्ध ‘नॅरेटिव्ह’ सेट करण्याचा प्रयत्न

Amravati आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांवरील आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी आणि वर्चस्व अधिक भक्कम करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली असून, रविवारी पार पडलेल्या आढावा बैठकीत पक्षाच्या रणनीतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. केवळ नेत्यांच्या सभांवर अवलंबून न राहता, यावेळी गावपातळीवरील कार्यकर्त्यांच्या फौजेला बळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेची सत्ता ही विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम मानली जाते. त्यामुळे ग्रामीण भागातील मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी गावनिहाय नियोजन आणि नव्या कार्यकर्त्यांची बांधणी यावर बैठकीत विशेष चर्चा झाली. विरोधकांना रोखण्यासाठी केवळ कागदी नियोजन न करता प्रत्यक्ष बुथ स्तरावर यंत्रणा राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Akola Municipal Corporation standing comittee : स्थायी समितीत शहर सुधार विकास आघाडीचे नऊ, काँग्रेसचे चार सदस्य

काँग्रेसने यावेळच्या निवडणुकीत ‘मायक्रो-मॅनेजमेंट’वर लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी काही प्रमुख धोरणे आखली गेली आहेत. बूथ प्रमुखांनी आपल्या क्षेत्रातील प्रत्येक मतदाराशी थेट संवाद साधून त्यांच्या स्थानिक समस्यांची नोंद घेणे. गावातील सक्रिय तरुणांना आणि नव्या चेहऱ्यांना पक्षात स्थान देऊन संघटन अधिक व्यापक करणे. केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या जनविरोधी धोरणांमुळे ग्रामीण जनतेच्या वाढलेल्या अडचणींना प्रचाराचा मुख्य मुद्दा बनवणे.

Sudhir Mungantiwar : विरोधी गटाच्या नेत्याचा फोन अन् मुनगंटीवारांनी अयोध्येतून फिरवले चक्र; पोलीस भरतीतील तांत्रिक अन्याय रोखण्याचे निर्देश

अमरावती जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काँग्रेसची पकड पारंपरिकरीत्या मजबूत असली, तरी गेल्या काही वर्षांत बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे पक्षासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. स्थानिक प्रश्नांवर लढा देऊन जनतेचा विश्वास पुन्हा संपादन करणे, हीच विजयाची गुरुकिल्ली असल्याचे मत बैठकीत व्यक्त झाले. ग्रामीण भागातील पाणीपुरवठा, कृषी सुविधा आणि पायाभूत प्रश्नांना ऐरणीवर आणून मतदारांमध्ये पक्षाची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.