Pravin Darekar said that Uddhav and Raj Thackeray’s attempt to come together is a political necessity : महाराष्ट्राचे हीत जपण्यासाठी देवाभाऊ भक्कम
Mumbai : महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या शक्यता बळावत चालल्या आहेत. यामध्ये राज ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. राज यांच्या पुढाकाराला उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे आगामी निवडणुकांपूर्वी दोन भावांत युती होईल, असे चित्र निर्माण झाले आहेत. यावर केवळ राजकीय गरज म्हणून या दोन भावांचा एकत्र येण्याचा प्रयत्न आहे, असे भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.
प्रवीण दरेकर काल (१९ एप्रिल) पत्रकारांशी बोलत होते ते म्हणाले, ‘आमच्यातील भांडणे छोटी आहेत, त्यापेक्षा महाराष्ट्राचे हीत मोठे आहे’, असे विधान राज ठाकरे यांनी केले. त्याला उद्धव ठाकरे यांनी ‘भांडणं मुळात नव्हतीच आणि असतीलही तर ती मिटवता येतील’, असे म्हणत राज ठाकरेंना सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी मुक्ताफळं उधळली. महाराष्ट्र हीत, मराठी माणूस, असं काहीतरी ते बोलले. पण महाराष्ट्र हीतासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार भक्कम आहे. त्यासाठी आमचे देवाभाऊच पुरेसे आहेत, असे म्हणत दरेकरांनी टोला हाणला.
Harshawardhan Sapkal : राज – उद्धव ठाकरे एकत्र येत असतील, तर स्वागतच !
महाराष्ट्राचे हीत कशा पद्धतीने केले जाऊ शकते, हे अख्खा महाराष्ट्र आज बघतोय. विकास गतीने होतो आहे. ठाकरे बंधुंना एकमेकांची राजकीय गरज भासू लागली आहे. म्हणून एकत्र येण्याचा हा त्यांचा प्रयत्न असू शकतो. संजय राऊत काय बोलले, हे सर्वांनी पाहिले आहे. पण राऊतांनी केलेले वक्तव्य स्थिर नसते. त्यांना कुणीही गांभीर्याने घेण्याची गरज नाही. प्रत्यक्षात काय होते, हे आधी बघावे लागेल. त्यानंतर यावर काही प्रतिक्रिया देता येईल, असे आमदार दरेकर म्हणाले.
Raj – Uddhav Thackeray : राज – उद्धव एकत्र येणार ? महाराष्ट्राचे राजकारण बदलणार ?
महाराष्ट्राचे हीत कोण करू शकतो, हे जनतेने निवडणुकीतून दाखवून दिले आहे. जनतेने आमच्यावर विश्वास टाकला. त्यामुळेच देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाले. तुम्ही तुमची भांडणे सोडवत असाल तर आनंदच आहे. पण महाराष्ट्राचे, मराठी माणसाचे नाव घेऊन राजकीय गणित मांडत असाल, तर महाराष्ट्रातील जनता हे न समजण्याइतकी खुळी नाही, असेही आमदार प्रवीण दरेकर म्हणाले.