Fraud of lakhs of rupees by fabricating fake attacks by wild animals : लाखो रुपयांचा गैरव्यवहार उघड; बनावट लाभार्थ्यांना लाखोंचा लाभ
Buldhana उदयनगर वनवर्तुळातील तत्कालीन वनपाल व वनमजुरांनी खोटे कागदपत्र तयार करून हिंस्त्र प्राण्यांच्या बनावटी हल्ल्यांद्वारे शासनाची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. धोत्रा नाईक येथील सामाजिक कार्यकर्ते दिलीप पाटील यांनी या गंभीर गैरव्यवहाराची तक्रार पालकमंत्री मकरंद पाटील यांच्याकडे केली असून, चौकशी समिती नेमण्याची मागणी केली आहे.
या गैरव्यवहारात वनमजूर अर्जुन राठोड आणि तत्कालीन वनपाल जाधव यांची भागीदारी असल्याचे समोर आले आहे. त्यांनी २०१९ ते २०२४ या काळात वन्य प्राण्यांच्या खोट्या हल्ल्यांचे बनावट प्रकरण उभे करून शासनाकडून २५ लाखांपर्यंतची मदत घेतली.विशेष म्हणजे, राठोड यांच्या कुटुंबावर दर ३–४ महिन्यांनी हल्ले झाल्याचे दाखवण्यात आले!
Reservation sub-category : मातंग समाजाचा जनआक्रोश, मुंबईत धडकणार!
फक्त जुने अधिकारीच नव्हे, तर विद्यमान वनपाल नेवरे व वनरक्षक गवळी यांच्यावरही रेती तस्करीला आशीर्वाद देण्याचा आरोप आहे. नदीपात्रातून अवैध वाळू उपसा सुरू असून, ट्रॅक्टर मालकांकडून घोषित हप्ता घेतल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दिलीप पाटील यांनी १७ फेब्रुवारी २०२५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यावर जिल्हा उपवनसंरक्षक सरोज गवस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चौकशी समिती नेमण्याचे व आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. मात्र, आदेश धुडकावून लावले गेले असून अजूनही समिती स्थापन झालेली नाही, हे विशेष.
Congress Tractor Morcha : काँग्रेसचा आज ट्रॅक्टर मोर्चा, सरकारी धोरणांचा करणार निषेध!
“शासनाची लाखोंची फसवणूक, वनसंपत्तीची तस्करी आणि अधिकार्यांचे दुर्लक्ष… या सर्व प्रकारांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी,” अशी मागणी दिलीप पाटील यांनी केली आहे.