Breaking

Congress Leader : पहिले देशातच पप्पू म्हणायचे, आता देशाबाहेरही पप्पू म्हणतात !

MLA Dr. Parinay Phuke’s bitter criticism of Rahul Gandhi : तेव्हाच माफी मागितली असती, तर बरं झालं असतं

Nagpur : शीख बांधवांची हत्या करून त्यांना बेघर करण्यात आलं होतं. हे काँग्रेसनं केलेलं पाप होतं. त्यामुळे राहुल गांधी आता माफी मागत आहेत. खरं पाहता त्यांनी याआधीच माफी मागायला पाहिजे होती. पण आता काँग्रेसचं अस्तित्व संपत आलं आहे. त्यामुळे माफी मागून राजकीय पोळी शेकून घेण्याचा हा राहुल गांधी यांचा प्रयत्न आहे, अशी टीका माजी राज्यमंत्री आमदार डॉ. परीणय फुके यांनी केली.

आज (५ मे) नागपुरात पत्रकारांशी बोलताना आमदार फुके म्हणाले, राहुल गांधी म्हणतात की मी तेव्हा राजकारणात नव्हतो. पण मग पहिल्यांदा जेव्हा ते खासदार झाले, तेव्हा त्यांनी का माफी नाही मागितली? तेव्हाच मागितली असती तर ते स्वागतार्ह आसतं. काँग्रेसची सातत्याने मलीन झालेली प्रतिमा सावरण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत आहेत. पण देशाची बदनामी करून त्यांचं काही भलं होणार नाही. राहुल गांधींना पहिले देशातच पप्पू म्हणायचे, पण आता त्यांनी जे वक्तव्य केलं आहे, त्यामुळे त्यांना देशाबाहेरही पप्पू म्हटले जात आहे.

Amravati District Bank : अमरावती जिल्हा बँकेच्या बैठकीत खोटे ठराव?

देशात जातीय जनगणना होणार आहे. त्यामुळे कुणाची किती संख्या आहे, हे स्पष्ट होणार आहे. जातिनिहाय जनगणना झाल्यानंतर मराठा समाज ३२ टक्के आहे की किती, हे स्पष्ट होणार आहे. त्यानंतर आरक्षण असो की सोयी सुविधा कोणत्या द्यायच्या, योजना कोणत्या लागू करायच्या, तेही ठरेल. त्यामुळे जरांगे पाटील यांनी घाई न करता, आता शांत रहावं.

R. S. Gawai memorial : दादासाहेब गवई स्मारकासाठी १२ कोटींचा अतिरिक्त निधी!

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपला चेटकीण संबोधलं. याबाबत विचारलं असता, ते स्वतःचं घर सांभाळू शकत नाहीयेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून स्टंटबाजी करण्याचा ते प्रयत्न करत असतात. त्यांच्याच पक्षातील लोक त्यांना स्वीकारत नाहीत. त्यामुळे ते पॅराशुट नेता म्हणून ते महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष झाले. ते म्हणजे लादल्या गेलेले नेते आहेत. त्यामुळे स्वतःचं अस्तित्व तयार करण्यासाठी प्रसिद्धी मिळवण्याचा ते अशा पद्धतीने प्रयत्न करत असतात, असे डॉ. परिणय फुके म्हणाले.