Breaking

Water quality committee’s report : गोंदियातील पाणी दुषित, १०४ गावांना ‘रेड कार्ड’!

Water in Gondia contaminated, 104 villages given ‘red card’ : नागरिकांचे आरोग्य धोक्यात; गुणवत्ता समितीच्या अहवालाने खळबळ

Gondia गोंदिया जिल्ह्यातील पाणी गुणवत्ता समितीच्या अहवालाने ग्रामीण आरोग्याच्या दृष्टीने मोठा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील ५४७ ग्रामपंचायतींपैकी तब्बल १०४ ग्रामपंचायतींमध्ये पिण्याचे पाणी दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना ‘रेड कार्ड’ देण्यात आले आहे. या गावांमध्ये पाण्याचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे. पिण्यायोग्य नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. आरोग्य विभागाने यासाठी तातडीने पाणी शुद्धीकरणाची आवश्यकता अधोरेखित केली आहे.

दूषित पाण्यामुळे मलेरिया, डेंग्यू, टायफॉइड, वंती, जंतुसंसर्ग यांसारख्या अनेक गंभीर जलजन्य आजारांचा धोका निर्माण होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, जगातील सुमारे ८० टक्के रोग हे अशुद्ध पाण्यामुळे होतात. त्यामुळे गोंदियात समोर आलेली ही स्थिती अत्यंत गंभीर मानली जात आहे.

Urjanagar : मुख्य अभियंत्यांसोबतची चर्चा ऊर्जा नगरच्या विकासात ठरणार मैलाचा दगड !

विशेष म्हणजे, जिल्ह्यात राइस मिलची संख्या मोठ्या प्रमाणात असून, या मिल्समधून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यामुळे आजूबाजूच्या विहिरी व हँडपंपातील पाणी दूषित होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या दूषित पाण्यातून गावकऱ्यांच्या घरांपर्यंत आजार पोहोचत आहेत. याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. भंडाऱ्यातून या मंडळाचे कामकाज चालवले जात असल्याने गोंदिया जिल्ह्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका होत आहे.

दूसरीकडे, ४४५ ग्रामपंचायतींना ‘ग्रीन कार्ड’ देण्यात आले आहे, म्हणजे त्याठिकाणी निर्जंतुकीकरण केलेले शुद्ध पाणी पुरविले जात आहे. यलो कार्ड ही एक इशारा पातळी असून, अशा गावांमध्ये पाण्याचा दर्जा सध्या पिण्यायोग्य असला तरी सुधारणा आवश्यक आहे.

पावसाळ्याच्या काळात पाण्याच्या साठ्यांमध्ये दूषण वाढते, आणि या काळात जलजन्य रोगांना खतपाणी मिळते. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीने पाणी स्रोतांची नियमित तपासणी करणे, निर्जंतुकीकरण करणे आणि नागरिकांना सुरक्षित पाण्याचा पुरवठा करणे ही काळाची गरज आहे.

Sand beach : लाभार्थ्यांचे नुकसान करू नका, आमदार मुनगंटीवार यांच्या सूचना

जिल्ह्याच्या आरोग्यविषयक सुरक्षेसाठी सर्व ग्रामपंचायतींनी ‘ग्रीन कार्ड’ प्राप्त करणे हे अंतिम उद्दिष्ट असले पाहिजे. यासाठी प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि ग्रामस्थ यांचे एकत्रित प्रयत्न आवश्यक आहेत.