Pratap Sarnaik assures that action will be taken against unauthorized school buses : राज्यात ५० ते ६० हजार स्कूल बसेस धोकादायक पद्धतीने करतात विद्यार्थ्यांची वाहतूक
Mumbai : शालेय विद्यार्थ्यांच्या स्कूल बसेसच्या अपघातांच्या अपघातांचे वाढते प्रमाण बघितले तर डोळे पांढरे झाल्याशिवाय राहात नाहीत. यासाठी वारंवार पालक, स्कूल बसेस संचालक आणि परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका होतात. हा कित्ता दरवर्षी गिरवला जातो. पण निकाल मात्र शून्यच. आता राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या समस्येवर कठोर भूमिका घेतली आहे.
राज्यात ५० ते ६० हजार स्कूल बसेस धोकादायक पद्धतीने विद्यार्थ्यांची ने – आण करतात. यांतील बऱ्याचशा बसेस अनधिकृत आहेत. अशा बसेसवर कारवाई करण्याचा पवित्रा परिवहन विभागाने घेतला आहे. २०११च्या नियमावलीनुसार सध्या ४० हजार स्कूल बसेस राज्यात सेवा देत आहेत. याव्यतिरिक्त ५० ते ६० हजार अनधिकृत स्कूल बसेस कार्यरत आहेत. याबाबतीत अनेक तक्रारी स्कूल बस चालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केल्या आहेत.
India – Pakistan War : युद्धजन्य परिस्थितीत प्रत्येकाने घ्यावे आपत्ती व्यवस्थापनाचे धडे !
अनधिकृत बस चालक-मालकांनी येत्या तीन महिन्यांत त्यांच्या त्यांच्या प्रादेशिक मोटर वाहन कार्यालयात दंडात्मक रक्कम भरून नियमावलीनुसार आपली बस अधिकृत करून घ्यावी. अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तीन महिन्यांनंतर ज्या प्रादेशिक परीवहन विभागांमध्ये अशा प्रकारच्या अनधिकृत बसेस आढळतील, त्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांवरदेखील कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.