Breaking

Crop Insurance : पाच तास आंदोलन, त्यानंतर अधिकाऱ्यांचे आश्वासन!

Five-hour protest by farmer’s organisation : पंधरा दिवसांत उर्वरित पीकविमा देण्याचा शब्द

Buldhana चिखली तालुक्यातील अनेक शेतकरी अद्यापही पीकविमा रकमेपासून वंचित आहेत. तर काहींना तुटपुंजी रक्कम मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर ८ मे राेजी क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी चिखलीतील कृषी कार्यालयात पाच तास ठिय्या आंदोलन छेडले.

पीकविमा मिळवण्यासाठी आक्रमक भूमिका घेत संघटनेचे विनायक सरनाईक, नितीन राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या कार्यालयाचा ताबा घेतला. २०२३ व २०२४ मध्ये खरीप व रब्बी हंगामासाठी पीकविमा घेतलेल्या शेतकऱ्यांनी वेळेत ऑनलाईन तक्रारी केल्या होत्या. मात्र, पंचनामे आणि रँडम पद्धतीमुळे अनेकांना अत्यल्प रक्कम – काही ठिकाणी फक्त २०० ते १००० रुपये – मिळाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, एकाच गट क्रमांकाच्या शेतांमध्येही रकमेतील तफावत मोठी आहे.

NCP Ajit Pawar : ४० वर्षे रिपाईचे काम केले, आता अजितदादांच्या राष्ट्रवादीत!

या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांनी जोरदार मागण्या लावून धरल्या. अखेर कृषी विभाग व विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी चर्चा करत आश्वासने दिली. उर्वरित शेतकऱ्यांचा पीकविमा पंधरा दिवसांत खात्यात जमा केला जाईल. तुटपुंजी रक्कम मिळालेल्यांसाठी तालुका तक्रार निवारण समितीच्या बैठकीत निर्णय घेऊन अहवाल शासनास पाठवण्यात येईल.

Water crisis : मेहकरात नळ बंद; टँकरचे भाव वाढले!

सर्व्हेची प्रत शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येईल. पीकविमा लाभार्थ्यांची यादी ग्रामपंचायत स्तरावर दोन दिवसांत लावण्यात येईल. या ठोस आश्वासनांनंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. या आंदोलनात विनायक सरनाईक, नितीन राजपूत, गोपाल ढोरे, ऋषिकेश भोपळे, पंजाबराव मुजमूले, विकास घूबे, विनोद घुबे, विशाल चिंचोले, तुळशिदास घूबे, गणेश घूबे, भगवान इंगळे, नारायण मिसाळ, कृष्णा तरमळे, गजानन तोरमल, शिवाजी तरमळे, अनिल डुकरे, देविदास मुजमुले, प्रकाश घूबे यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते.