Breaking

India – Pakistan War : महाराष्ट्रात मॉकड्रिल, ब्लॅकआऊट संदर्भात मुख्यमंत्र्यांचे निर्देश !

CM Devendra Fadinvis’s instructions regarding mock drills and blackouts in Maharashtra : केंद्र सरकारच्या युनियन वॉर बुकचे सखोल अध्ययन करा

Mumbai : भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर सध्या तणाव निर्माण झालेला आहे. सतत गोळीबार सुरू आहे. अशा वेळी महाराष्ट्रातही मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट केले जात आहे. या सर्व स्थितीचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून त्यांनी राज्यातील सुरक्षा आणि सज्जतेची परिस्थिती जाणून घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत होते.

आढावा घेताना मुख्यमंत्र्यांनी दिशानिर्देश दिले आहेत. प्रभारी मुख्य सचिव राजेशकुमार, राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगरानी, नागरी सुरक्षाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रभातकुमार, गृह विभागाच्या प्रधान सचित राधिका रस्तोगी, गुप्तवार्ता विभागाचे अतिरिक्त पोलिस महानिरीक्षक शिरीष जैन, मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Kharif season : खरीप तोंडावर, कृषी सहायक संपावर!

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ब्लॅकआऊट म्हणजे काय आणि अशा वेळी काय करावे, याचे व्हिडिओ विद्यार्थी आणि नागरिकांपर्यंत पोहोचवा, याची जनजागृती करा. ब्लॅकआऊटच्यी वेळी हॉस्पिटलसोबत समन्वय यंत्रणा उभी करा. टार्गेट होऊ नये म्हणून लाईट बंद केले जातात. त्यामुळे पर्यायी विद्युत व्यवस्था करा. गडद रंगाचे पडदे अथवा गडद रंगाच्या काचा वापरून बाहेरून लाईट दिसणार नाही, अशी व्यवस्था करा. केंद्र सरकारच्या युनियन वॉर बुकचे अध्ययन करून सर्वांना त्याची माहिती द्या.

पोलिसांच्या सायबर सेलमार्फत प्रत्येक जिल्ह्यात समाजमाध्यमांवर देखरेख ठेऊन पाकिस्तानला मदत करणारे हॅन्डल्स ओळखून कारवाई करा. शत्रुला मदत करणारी अथवा चुकीची माहिती कुणी प्रसारीत करीत असेल तर त्यावर कारवाई करा. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना आपत्कालीन फंड आजच देण्यात येईल. त्यातून काही तातडीच्या साहित्याची खरेदी करायची असेल तर ती तात्काळ करता येईल. याव्यतिरिक्त कोणताही महत्वाचा प्रस्ताव आला तर तो एक तासाच्या आत मंजूर करा.

Crop Insurance : पाच तास आंदोलन, त्यानंतर अधिकाऱ्यांचे आश्वासन!

शासनाच्या अतिमहत्वाच्या पायाभूत सुविधांवर सायबर हल्ले होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता सायबर विभागाकडून त्वरित ऑडीट करून घ्या. सरकार आणि सुरक्षा यंत्रणा यात अधिक समन्वयासाठी मुंबईतील सैन्याचे तिन्ही दल तसेच कोस्टगार्डच्या प्रमुखांना पुढील बैठकीत व्हीसीच्या माध्यमातून निमंत्रित करा. राज्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.