Ultimatum to encroachers to vacate the premises : आता एनायटीने दिला अल्टिमेटम; कारवाई होण्याची शक्यता कमीच
Nagpur उत्तर नागपुरात नागपूर सुधार प्रन्यासच्या (नासुप्र) मालकीच्या अनेक रिकाम्या जमिनींवर गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. दोन वर्षांपूर्वी नासुप्रने अतिक्रमण हटविले होते, परंतु पुन्हा नव्याने अतिक्रमण वाढले आहे. काही अतिक्रमणधारकांनी पक्के बांधकाम केले आहे. अतिक्रमण करणाऱ्यांना विभागीय कार्यालयाने सार्वजनिक नोटीस जारी करून तीन दिवसांत जमिनी रिकाम्या करण्याचा अल्टिमेटम दिला आहे, अन्यथा कारवाईचा इशारा दिला आहे.
महानगरपालिकेच्या निवडणुका पाहता राजकीय मंडळींकडून ही कारवाई थांबविण्यासंदर्भात दबाव येण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. उत्तर नागपूर विभागातील नासुप्रच्या काही जमिनींवर अतिक्रमण करून पक्के घरे आणि दुकाने बांधले गेले आहेत. यात यशोधरानगरात बोगस दस्तावेज तयार करून जागेवर हक्क सांगण्याचे प्रकार समोर आले आहेत.
Local Body Elections : एका महिन्यात जाहीर करायचे होते वेळापत्रक, तीन आठवडे उलटले!
वर्ष २०२३ मध्ये नासुप्रच्या एका मोठ्या भूखंडावर करण्यात आलेले अतिक्रमण हटविण्यात आले होते, परंतु पुन्हा नव्याने अतिक्रमण झाले. संघर्षनगरातही रिकाम्या जमिनीवर पक्के बांधकाम करून दुकाने उभारण्यात आली आहेत.मौजा वांजरी खसरा क्रमांक ३० ते ३५, तसेच यशोधरानगर, सरवराचाद, प्रवेशनगर, योगी अरविंदनगर, शिवाजी चौक, पवननगर, संगमनगर, मेहबूबपुरा, संजीवनीनगर क्वार्टर, हमीदनगर, संघर्षनगर (खसरा क्रमांक १२/२, १७, १८, १९) या परिसरांमध्ये नासुप्रच्या जमिनीवर अंदाजे ३२५ लोकांनी अतिक्रमण केले आहे.
या सर्वांना नासुप्रने देऊन अतिक्रमण हटविण्याची शेवटची संधी दिली आहे, अन्यथा कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.