Breaking

Maha Politics : नितेश राणे आपल्या वक्तव्यावर ठाम; म्हणाले, ईद इको फ्रेंडलीच झाली पाहिजे !

Nitesh Rane stands by his statement, Eid should be eco-friendly : सोसायट्यांमध्ये बकरे कापल्यास दंगली होऊ शकतात

Nagpur : नितेश राणे यांनी बकरी ईद संदर्भात वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्रात मुस्लीम बांधवांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहेत. अलंपसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी राणेंना नोटीस देण्याची तयारी चालवली आहे. पण नितेश राणे आपल्या वक्तव्यावर अजूनही ठाम आहेत. ईद ही इको फ्रेंडलीच झाली पाहिजे, असे ते म्हणाले.

नागपुरात काल (ता. ४ जून) आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, जेव्हा इको फ्रेंडली होळी, इको फ्रेंडली दिवाळी करा. फटाके मुक्त दिवाळी साजरी करा, असे असंख्य सल्ले हिंदू समाजाला दिले जातात, तेव्हा हींदू समाज समजून घेतो. दुसऱ्या धर्मांना नावे ठेवत बसत नाही. हिंदू समाज आपला धाक दाखवत नाही. तसाच विचार मुस्लीमांनीदेखील करावा, अशी माझी भूमिका व सल्ला आहे.

Forest Department : वनमंत्री गणेश नाईकांना राजकारणावर बोलायचं नाही !

जबाबदार पदावर बसलेल्या व्यक्तीने जबाबदारीने भूमिका बजावली पाहिजे, असं मी मानतो. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष म्हणून प्यारे खान यांनी मुस्लीम आणि अल्पसंख्याक समाजाला एकत्रित करून याबाबत त्यांचे प्रबोधन करण्याची भूमिका घेतली पाहिजे. पण सध्या प्यारे खान यांची जी भूमिका आहे, ती इस्लामला बदनाम करणारी आहे. ज्याप्रमाणे हिंदू समाज पर्यावरणवाद्यांचे ऐकतो आणि फटाके वाजवत नाही, रंग खेळत नाही. त्याचप्रमाणे मुस्लीमांनी इको फ्रेंडली बकरी ईद साजरी करावी, हा माझा सल्ला आहे. यामध्ये हिंदू – मुस्लीम वाद निर्माण करण्याचा प्रश्नच कुठे येतो, असे नितेश राणे म्हणाले.

Local Body Elections : भाजपचा तरुण नेतृत्वावर विश्वास; मंदार बाहेकर नवे शहराध्यक्ष

बकरी ईदमुळे हिंदू अस्वस्थ आहेत. कारण त्यांच्या सोसायट्यांमध्ये बकरे कापले जाणार. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होणार आणि दोन्ही समाजांत वाद निर्माण होणार. उद्या त्यामुळे दंगली पण होऊ शकतात. हे थांबवण्यासाठी कुणी सल्ला दिला तर तो ऐकला पाहिजे. हिंदू समाजाला सल्ले दिले जातात, तेव्हा हिंदू समाज आक्रोश करतो का? जोर जबरदस्ती करतो का? मग अबू आझमी कसं बोलतो की, ‘हम तो बकरा काटेंगे’. त्यामुळे इस्लामला कोण बदनाम करत आहे आणि फडणवीस यांची बदनामी कोण करत आहे, हे महाराष्ट्राला कळतंय. महाराष्ट्र शांत ठेवायचा असेल तर इको फ्रेंडली बकरी ईद हा चांगला पर्याय आहे, असेही नितेश राणे म्हणाले.