Breaking

Pankaja Munde : बच्चू कडूंना वेगळे भेटण्याचे कारण नाही

Minister said she spoke to Bachchu Kadu on phone call : राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी; मंत्री पंकजा मुंडे यांची भूमिका

Amravati राज्याच्या महसूल मंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः बच्चू कडू यांची भेट घेतली आहे. मीदेखील त्यांच्याशी फोनवर बोलले आहे. शेळ्या व मेंढ्यांविषयी त्यांनी जे प्रश्न मांडलेले असतील, त्यावर कारवाई केली जाईलच. त्यांची प्रकृती लवकर सुधारावी, हेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे आता वेगळे भेटण्याचे काही कारण नसल्याचे राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

मुंडे या शनिवार व रविवार असलेल्या दोन दिवसीय अमरावती दौऱ्यावर असताना त्यांनी अमरावती शहरातील भाजप कार्यालयात पत्रपरिषद घेतली. सात दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या बच्चू कडू यांची भेट घेणार आहात का, असं विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी भूमिका स्पष्ट केली. यावेळी भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, शहर जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन धांडे, जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख व प्रभूदास भिलावेकर आदी उपस्थित होते.

Rashtriya swayamsevak sangh : भाजप नेत्यांच्या अपेक्षा, संघाने दिला सल्ला

पर्यावरण रक्षणाकरिता प्लास्टिकवरील अवलंबित्व कमी करणं गरजेचं असून त्यासाठी सर्वांनी एकजूट दाखवावी असं पंकजा मुंडे म्हणाल्या. “भाजीवाले असो, फलवाले असो किंवा इतर विक्रेते असोत – त्यांनी आपल्याला प्लास्टिक पिशव्या देतील असं समजण्याऐवजी स्वतःजवळ कापडाची पिशवी असावी. असं झालं तर एकदाचा प्लास्टिकला आळा घालणं शक्य होईल.” असं त्यांनी म्हटलं.

गोपीनाथ मुंडे यांच्या मंदिराचा प्रश्न असलेल्या गोलाई या गावातील कार्यक्रमासंदर्भात पंकजा मुंडे म्हणाल्या, “गोपीनाथ मुंडे यांची मंदिरे अनेक ठिकाणी उभारण्यात आली आहेत. या सर्व ठिकाणी माझ्या उपस्थितीची वाट न पाहता मंदिरांमध्ये मूर्तीची स्थापना करावी. या मंदिरांना नंतर नक्कीच भेट देता येईल.”

Ashish shelar : मोठया गणेशमुर्ती विसर्जनाबाबत ३० तारखेपर्यंत भूमिका मांडू

गेल्या ११ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामांमुळे देश महासत्ता होण्याच्या मार्गावर असून गरिबांना घर, उज्ज्वला योजना इत्यादी कार्यक्रमांद्वारा दिलासा मिळाला आहे. गरिबांचे जीवनमान उंचवण्यात या योजना प्रभावी ठरल्या असून मंदीच्या काळातदेखील कामाचा ओघ सुरू असणे ही मोठी गोष्ट असल्याचं पंकजा मुंडे यांनी अधोराेखित केले.